शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

युती तुटली नसती तर भाजपाची ताकद कळली नसती - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: May 23, 2015 13:54 IST

विधासभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपाला स्वत:ची ताकद कळलीच नसती, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ऑनलाइन लोकमत 
कोल्हापूर, दि. २३ - विधासभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपाला स्वत:ची ताकद कळलीच नसती, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूरमध्ये भाजपा कार्यकारिणीचे तीन दिवसीय अधिवेशन सुरू झाले असून त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दहा कोटी सदस्य संख्या असलेल्या पक्षाचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. 
'विधानसभा निवडणुकीवेळी युती तुटेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, मात्र स्वबळावर लढल्यावर भाजपाला शंभरहून अधिक जागा मिळाल्या. आम्ही युतीतून वेगळे झालो म्हणूनच आम्हाला आमची ताकद समजली', असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या जनतेचाही पक्षाला आशिर्वाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच या निवडणुकीतील यशात अमित शहा यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितलं. निवडणुकीपूर्वी ते एक महिनाभर मुंबईत तळ ठोकून होते आणि त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले' असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
गेल्या ६० वर्षांत ज्यांनी जनहितार्थ एकही काम केले नाही, ते आमच्याकडे एका वर्षाचा हिशोब मागत आहेत, असा टोला हाणत काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत काय काय केले हे सांगावे, असा सवाल भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अधिवेशनादरम्यान केला. गरिबी हटवण्यासाठी मोदी सरकारने जे काही केलं ते आधीच्या सरकारने कधीच केलं नाही, असा आरोप शहा यांनी केला. काँग्रेसला काळ्या पैशांवर बोलण्याचा काहीही अधिकार नसल्याचेही ते म्हणाले. 
जनसंघाची स्थापना झाली तेव्हा असं कोणालाच वाटलं नव्हतं की भाजपा सत्तेत येईल. मात्र पक्षाच्या अनेक सदस्यांनी स्थापनेपासूनच अथक मेहनत केल्यामुळेच भाजपाला आज हे घवघवीत यश मिळालं आहे. अनेक सदस्यांच्या त्यागामुळे भाजपा आज यशाच्या शिखरावर असून जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, असेही शाह यांनी सांगितले.
निवडणुकीपूर्वी भाजपाने जनतेला भ्रष्टाचारमुक्त सरकारचे आश्वासन दिले होते आणि ते पूर्ण करण्यात केंद्र व राज्य सरकारला यश मिळाले आहे, एक वर्षात मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाली नाही असे ते म्हणाले. तसेच सत्तेतील भागीदारांनी आम्हाला वर्षभर पूरेपूर साथ दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
गरिबीचे महत्वाचे कारण बेरोजगारी असल्याचे सांगत ती कमी करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले असून 'मेक इन इंडिया' हे त्यातील एक महत्वाचे पाऊल आहे, असे शहा यांनी सांगितले.