शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

युती तुटली नसती तर भाजपाची ताकद कळली नसती - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: May 23, 2015 13:54 IST

विधासभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपाला स्वत:ची ताकद कळलीच नसती, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ऑनलाइन लोकमत 
कोल्हापूर, दि. २३ - विधासभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपाला स्वत:ची ताकद कळलीच नसती, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूरमध्ये भाजपा कार्यकारिणीचे तीन दिवसीय अधिवेशन सुरू झाले असून त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दहा कोटी सदस्य संख्या असलेल्या पक्षाचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. 
'विधानसभा निवडणुकीवेळी युती तुटेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, मात्र स्वबळावर लढल्यावर भाजपाला शंभरहून अधिक जागा मिळाल्या. आम्ही युतीतून वेगळे झालो म्हणूनच आम्हाला आमची ताकद समजली', असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या जनतेचाही पक्षाला आशिर्वाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच या निवडणुकीतील यशात अमित शहा यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितलं. निवडणुकीपूर्वी ते एक महिनाभर मुंबईत तळ ठोकून होते आणि त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले' असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
गेल्या ६० वर्षांत ज्यांनी जनहितार्थ एकही काम केले नाही, ते आमच्याकडे एका वर्षाचा हिशोब मागत आहेत, असा टोला हाणत काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत काय काय केले हे सांगावे, असा सवाल भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अधिवेशनादरम्यान केला. गरिबी हटवण्यासाठी मोदी सरकारने जे काही केलं ते आधीच्या सरकारने कधीच केलं नाही, असा आरोप शहा यांनी केला. काँग्रेसला काळ्या पैशांवर बोलण्याचा काहीही अधिकार नसल्याचेही ते म्हणाले. 
जनसंघाची स्थापना झाली तेव्हा असं कोणालाच वाटलं नव्हतं की भाजपा सत्तेत येईल. मात्र पक्षाच्या अनेक सदस्यांनी स्थापनेपासूनच अथक मेहनत केल्यामुळेच भाजपाला आज हे घवघवीत यश मिळालं आहे. अनेक सदस्यांच्या त्यागामुळे भाजपा आज यशाच्या शिखरावर असून जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, असेही शाह यांनी सांगितले.
निवडणुकीपूर्वी भाजपाने जनतेला भ्रष्टाचारमुक्त सरकारचे आश्वासन दिले होते आणि ते पूर्ण करण्यात केंद्र व राज्य सरकारला यश मिळाले आहे, एक वर्षात मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाली नाही असे ते म्हणाले. तसेच सत्तेतील भागीदारांनी आम्हाला वर्षभर पूरेपूर साथ दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
गरिबीचे महत्वाचे कारण बेरोजगारी असल्याचे सांगत ती कमी करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले असून 'मेक इन इंडिया' हे त्यातील एक महत्वाचे पाऊल आहे, असे शहा यांनी सांगितले.