शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

युती तुटली नसती तर भाजपाची ताकद कळली नसती - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: May 23, 2015 13:54 IST

विधासभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपाला स्वत:ची ताकद कळलीच नसती, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ऑनलाइन लोकमत 
कोल्हापूर, दि. २३ - विधासभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपाला स्वत:ची ताकद कळलीच नसती, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूरमध्ये भाजपा कार्यकारिणीचे तीन दिवसीय अधिवेशन सुरू झाले असून त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दहा कोटी सदस्य संख्या असलेल्या पक्षाचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. 
'विधानसभा निवडणुकीवेळी युती तुटेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, मात्र स्वबळावर लढल्यावर भाजपाला शंभरहून अधिक जागा मिळाल्या. आम्ही युतीतून वेगळे झालो म्हणूनच आम्हाला आमची ताकद समजली', असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या जनतेचाही पक्षाला आशिर्वाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच या निवडणुकीतील यशात अमित शहा यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितलं. निवडणुकीपूर्वी ते एक महिनाभर मुंबईत तळ ठोकून होते आणि त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले' असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
गेल्या ६० वर्षांत ज्यांनी जनहितार्थ एकही काम केले नाही, ते आमच्याकडे एका वर्षाचा हिशोब मागत आहेत, असा टोला हाणत काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत काय काय केले हे सांगावे, असा सवाल भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अधिवेशनादरम्यान केला. गरिबी हटवण्यासाठी मोदी सरकारने जे काही केलं ते आधीच्या सरकारने कधीच केलं नाही, असा आरोप शहा यांनी केला. काँग्रेसला काळ्या पैशांवर बोलण्याचा काहीही अधिकार नसल्याचेही ते म्हणाले. 
जनसंघाची स्थापना झाली तेव्हा असं कोणालाच वाटलं नव्हतं की भाजपा सत्तेत येईल. मात्र पक्षाच्या अनेक सदस्यांनी स्थापनेपासूनच अथक मेहनत केल्यामुळेच भाजपाला आज हे घवघवीत यश मिळालं आहे. अनेक सदस्यांच्या त्यागामुळे भाजपा आज यशाच्या शिखरावर असून जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, असेही शाह यांनी सांगितले.
निवडणुकीपूर्वी भाजपाने जनतेला भ्रष्टाचारमुक्त सरकारचे आश्वासन दिले होते आणि ते पूर्ण करण्यात केंद्र व राज्य सरकारला यश मिळाले आहे, एक वर्षात मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाली नाही असे ते म्हणाले. तसेच सत्तेतील भागीदारांनी आम्हाला वर्षभर पूरेपूर साथ दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
गरिबीचे महत्वाचे कारण बेरोजगारी असल्याचे सांगत ती कमी करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले असून 'मेक इन इंडिया' हे त्यातील एक महत्वाचे पाऊल आहे, असे शहा यांनी सांगितले.