शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

युती तुटली नसती तर भाजपाची ताकद कळली नसती - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: May 23, 2015 13:54 IST

विधासभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपाला स्वत:ची ताकद कळलीच नसती, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ऑनलाइन लोकमत 
कोल्हापूर, दि. २३ - विधासभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबतची युती तुटली नसती तर भाजपाला स्वत:ची ताकद कळलीच नसती, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूरमध्ये भाजपा कार्यकारिणीचे तीन दिवसीय अधिवेशन सुरू झाले असून त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. दहा कोटी सदस्य संख्या असलेल्या पक्षाचा सदस्य असल्याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. 
'विधानसभा निवडणुकीवेळी युती तुटेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, मात्र स्वबळावर लढल्यावर भाजपाला शंभरहून अधिक जागा मिळाल्या. आम्ही युतीतून वेगळे झालो म्हणूनच आम्हाला आमची ताकद समजली', असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या जनतेचाही पक्षाला आशिर्वाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच या निवडणुकीतील यशात अमित शहा यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितलं. निवडणुकीपूर्वी ते एक महिनाभर मुंबईत तळ ठोकून होते आणि त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले' असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
गेल्या ६० वर्षांत ज्यांनी जनहितार्थ एकही काम केले नाही, ते आमच्याकडे एका वर्षाचा हिशोब मागत आहेत, असा टोला हाणत काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत काय काय केले हे सांगावे, असा सवाल भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अधिवेशनादरम्यान केला. गरिबी हटवण्यासाठी मोदी सरकारने जे काही केलं ते आधीच्या सरकारने कधीच केलं नाही, असा आरोप शहा यांनी केला. काँग्रेसला काळ्या पैशांवर बोलण्याचा काहीही अधिकार नसल्याचेही ते म्हणाले. 
जनसंघाची स्थापना झाली तेव्हा असं कोणालाच वाटलं नव्हतं की भाजपा सत्तेत येईल. मात्र पक्षाच्या अनेक सदस्यांनी स्थापनेपासूनच अथक मेहनत केल्यामुळेच भाजपाला आज हे घवघवीत यश मिळालं आहे. अनेक सदस्यांच्या त्यागामुळे भाजपा आज यशाच्या शिखरावर असून जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, असेही शाह यांनी सांगितले.
निवडणुकीपूर्वी भाजपाने जनतेला भ्रष्टाचारमुक्त सरकारचे आश्वासन दिले होते आणि ते पूर्ण करण्यात केंद्र व राज्य सरकारला यश मिळाले आहे, एक वर्षात मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाली नाही असे ते म्हणाले. तसेच सत्तेतील भागीदारांनी आम्हाला वर्षभर पूरेपूर साथ दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
गरिबीचे महत्वाचे कारण बेरोजगारी असल्याचे सांगत ती कमी करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले असून 'मेक इन इंडिया' हे त्यातील एक महत्वाचे पाऊल आहे, असे शहा यांनी सांगितले.