शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

आदर्श रिक्षा,टॅक्सी चालकाला मिळणार पुरस्कार

By admin | Updated: July 28, 2016 20:35 IST

भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दटपणे वागणे इत्यादी कारणांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी अंधेरी आरटीओने एक उपक्रम सुरु केला आहे

अंधेरी आरटीओचा उपक्रमवान्द्रे ते दहिसरमधील चालकांची होणार निवडमुंबई - भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दटपणे वागणे इत्यादी कारणांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी अंधेरी आरटीओने एक उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाव्दारे आदर्श रिक्षा,टॅक्सी चालकाची निवड केली जाणार आहे. वान्द्रे ते दहिसरमधील चालकांची निवड केली जाणार असून त्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन केले आहे.

प्रवाशांना प्रामाणिकपणे सेवा देणे, आपल्या मुलांना उच्चशिक्षण देणे, अपघातग्रस्तांना मदत करणे, उल्लेखनीय सामाजिक कार्य करणे असे काम करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पश्चिम विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी एम.बी.जाधव यांनी सांगितले. एक पुरस्कारप्राप्त चालकांना अडीच हजार रुपये, एक लाख रुपयांचा वैयक्तिक विमा, त्यांच्या कुटूंबियाला मोफत वैद्यकीय सेवा, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या निकषात बसणाऱ्या व पुरस्कारासाठी इच्छुक असलेल्या वान्द्रे ते दहिसर या कार्यक्षेत्रातील रिक्षा व टॅक्सी चालकांनी आपले नाव, वय, जन्मतारीख, सेवेचा एकूण कालावधी, पार्श्वभूमी, परवाना व बिल्ला क्रमांक, रिक्षा व टॅक्सी क्रमांक, शिक्षण व उल्लेखनीय कामांची माहिती असा तपशील द्यावा लागेल, असे जाधव म्हणाले. आरटीओ व रोटरी क्लब आॅफ बॉम्बे ईस्ट यांच्या संयुक्तपणे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रांसह सर्व माहिती मुंबई पश्चिम विभाग आरटीओ कार्यालय, मनिष नगर अंधेरी पश्चिम येथे प्रत्यक्ष किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.