शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार कोटींची शासकीय जमीन विकण्याचा विचार

By admin | Updated: October 22, 2015 02:13 IST

वापरात नसलेली शासकीय जमीन व्यावसायिक दराने विकण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. कर्जाच्या बोजाखाली असलेल्या सरकारला त्यानिमित्ताने थोडासा दिलासा मिळेल.

मुंबई : वापरात नसलेली शासकीय जमीन व्यावसायिक दराने विकण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. कर्जाच्या बोजाखाली असलेल्या सरकारला त्यानिमित्ताने थोडासा दिलासा मिळेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच राज्याच्या आर्थिक स्थितीचा एका बैठकीत आढावा घेतला. या बैठकीला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. राज्याचे उत्पन्न चालू वित्तीय वर्षात किमान १२ हजार कोटी रुपयांनी वाढविण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. निवासी आणि औद्योगिक वापराच्या जमिनींवर प्रीमियम आकारून एफएसआय वा टीडीआर देण्याचे धोरण सध्याच्या सरकारने स्वीकारले आहे. त्यातून ५ हजार कोटी रुपयांचे जादा उत्पन्न सरकारला मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने अब्जावधी रुपये किंमत असलेल्या जमिनी लिजवर दिलेल्या आहेत. त्यापासून सरकारला अत्यल्प असे उत्पन्न मिळते. या जमिनींची मालकी सरकारकडे ठेवताना बांधकामाबाबतचे सध्याचे निर्बंध हटविले तर जवळपास २ हजार कोटी रुपयांचे जादा उत्पन्न राज्य सरकारला मिळू शकेल, असाही एक अंदाज आहे. राज्य सरकारच्या वर्षानुवर्षे नुसत्या पडून असलेल्या जमिनींच्या विक्रीतून ५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ही प्रक्रिया पारदर्शक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी उपाययोजना, टोलमाफी आणि एलबीटी मुक्तीमुळे राज्याच्या तिजोरीवर १४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. उत्पन्नाची बाजू वाढविल्यास सरकारला दिलासा मिळू शकेल. (विशेष प्रतिनिधी)