शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तर मी बदलणं गरजेचे - पंकजा मुंडे

By admin | Updated: August 27, 2016 17:22 IST

शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, या आहाराचा उपयोग गुरांना चारा म्हणून दिला जातो याशिवाय अन्य आरोप होत असताना मी गप्प बसणे योग्य नाही, त्यासाठी मी बदलणं गरजेचे असल्याचं पंकजा मुंडे बोलल्या आहेत

- आप्पासाहेब पाटील / ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 27 - शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, या आहाराचा उपयोग गुरांना चारा म्हणून दिला जातो याशिवाय अन्य आरोप होत असताना मी गप्प बसणे योग्य नाही, त्यासाठी मी बदलणं गरजेचे आहे ना.. शालेय पोषण आहाराचे टेंडर तर मागच्या सरकारने काढलेले आहे़ त्यात बदल करणे काळाची गरज असून त्यानुसार मी शालेय पोषण आहाराच्या रेसिपीत बदल केला आहे़ त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी ठेवला आहे़ सही झाली की नवीन रेसिपी लगेच जाहीर करून मुलांना सकस आहार पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. हिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी १०० मुद्दे तयार करण्यात आल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले़ 
पुढे बोलताना ग्रामविकासमंत्री मुंढे म्हणाल्या की, शालेय पोषण आहारात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सहा महिने ते दोन वर्षाची जी मुले आहेत, त्या मुलांना शिशू आहार दिला पाहिजे. आता सध्याच्या घडीला या मुलांना आपण पाच वर्षाच्या मुलांना जो देतो तोच आहार देतो ते चुकीचे आहे.  कारण उकडलेले अंडे हे सहा महिन्याचे बाळ नाही खाऊ शकत. त्यामुळे सहा महिने ते दोन वर्षाच्या मुलांना सेरेलॅक सारखा शिशूचा आहार देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. नव्या प्रस्तावात शालेय पोषण आहारात गटनिहाय रेसिपी वेगळ्या केल्या आहेत.  दोन ते सहा या वयोगटातील मुलांच्या रेसिपीतही बदल केला. शिवाय किशोरवयीन मुली व गर्भधारणा केलेल्या मातांच्याही आहारात बदल केला़  याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे तो लवकरच सही होऊन पुढे येईल असेही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले़ 
आरोप तर होणारच
कोणतेही नवीन निर्णय घेताना आरोप होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण कॉन्ट्रक्टरची एक तालुकास्तरावर मोठी फळी आहे. तालुकास्तरावर हा आरोप केला जातो की हा पोषण आहार गुरांना खाऊ घातला जातो. या होणाºया आरोपामुळे मी बदलले पाहिजे ना कारण टेंडर तर मी काढलेले नाही. पुर्वीच्या सरकारने टेंडर काढले़ जर पोषण आहार गुरांना खाऊ घालत असतील तर मी बदलणं महत्वाचे आहे. त्यामुळे मी पोषण आहारात बदल केले आहेत़ तरीही माझ्यावर काही आरोप झाले तरी माझा मला लोकांना रोजगार देण्यासाठी हा आहार बनवायचा नाही तर हा आहार सकस बनविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे़