शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

तर मी बदलणं गरजेचे - पंकजा मुंडे

By admin | Updated: August 27, 2016 17:22 IST

शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, या आहाराचा उपयोग गुरांना चारा म्हणून दिला जातो याशिवाय अन्य आरोप होत असताना मी गप्प बसणे योग्य नाही, त्यासाठी मी बदलणं गरजेचे असल्याचं पंकजा मुंडे बोलल्या आहेत

- आप्पासाहेब पाटील / ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 27 - शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, या आहाराचा उपयोग गुरांना चारा म्हणून दिला जातो याशिवाय अन्य आरोप होत असताना मी गप्प बसणे योग्य नाही, त्यासाठी मी बदलणं गरजेचे आहे ना.. शालेय पोषण आहाराचे टेंडर तर मागच्या सरकारने काढलेले आहे़ त्यात बदल करणे काळाची गरज असून त्यानुसार मी शालेय पोषण आहाराच्या रेसिपीत बदल केला आहे़ त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी ठेवला आहे़ सही झाली की नवीन रेसिपी लगेच जाहीर करून मुलांना सकस आहार पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. हिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी १०० मुद्दे तयार करण्यात आल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले़ 
पुढे बोलताना ग्रामविकासमंत्री मुंढे म्हणाल्या की, शालेय पोषण आहारात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सहा महिने ते दोन वर्षाची जी मुले आहेत, त्या मुलांना शिशू आहार दिला पाहिजे. आता सध्याच्या घडीला या मुलांना आपण पाच वर्षाच्या मुलांना जो देतो तोच आहार देतो ते चुकीचे आहे.  कारण उकडलेले अंडे हे सहा महिन्याचे बाळ नाही खाऊ शकत. त्यामुळे सहा महिने ते दोन वर्षाच्या मुलांना सेरेलॅक सारखा शिशूचा आहार देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. नव्या प्रस्तावात शालेय पोषण आहारात गटनिहाय रेसिपी वेगळ्या केल्या आहेत.  दोन ते सहा या वयोगटातील मुलांच्या रेसिपीतही बदल केला. शिवाय किशोरवयीन मुली व गर्भधारणा केलेल्या मातांच्याही आहारात बदल केला़  याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे तो लवकरच सही होऊन पुढे येईल असेही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले़ 
आरोप तर होणारच
कोणतेही नवीन निर्णय घेताना आरोप होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण कॉन्ट्रक्टरची एक तालुकास्तरावर मोठी फळी आहे. तालुकास्तरावर हा आरोप केला जातो की हा पोषण आहार गुरांना खाऊ घातला जातो. या होणाºया आरोपामुळे मी बदलले पाहिजे ना कारण टेंडर तर मी काढलेले नाही. पुर्वीच्या सरकारने टेंडर काढले़ जर पोषण आहार गुरांना खाऊ घालत असतील तर मी बदलणं महत्वाचे आहे. त्यामुळे मी पोषण आहारात बदल केले आहेत़ तरीही माझ्यावर काही आरोप झाले तरी माझा मला लोकांना रोजगार देण्यासाठी हा आहार बनवायचा नाही तर हा आहार सकस बनविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे़