शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सदाभाऊंची घराणेशाही मला मान्य नाही - राजू शेट्टी

By admin | Updated: February 13, 2017 22:05 IST

गेली पंधरा वर्षे शेतकरी संघटनेचा नेता म्हणून दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाही विरुद्ध आम्ही डंका पेटविला आणि माझाच सहकारी पुन्हा त्याच वाटेने

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 13 -  गेली पंधरा वर्षे शेतकरी संघटनेचा नेता म्हणून दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाही विरुद्ध आम्ही डंका पेटविला आणि माझाच सहकारी पुन्हा त्याच वाटेने जाणार असेल तर ते माझ्या ‘इथिक्स’ मध्ये बसत नाही, त्यामुळे सदाभाऊंची घराणेशाही मला मान्य नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. लातूर येथे ते एका खासगी दूरचित्रवाहिनीशी बोलत होते. त्यानंतर ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हीच भूमिका पुन्हा स्पष्टपणे मांडली.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत हा सांगली जिल्ह्यातील बागणी (ता.वाळवा) जिल्हा परिषद मतदार संघातून रयत विकास आघाडीतून निवडणूकीस उभा आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता शेट्टी म्हणाले,‘काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाहीविरुध्द मी गेली पंधरा वर्षे डंका पेटवित आहे. आता ही सर्वच पक्षांतील अनेक नेत्यांची पोरटोरं या निवडणूकीत उभा आहेत. नेत्यांनीच आपल्या पोरांना निवडणुकीत उभे केले तर पक्षासाठी, संघटनेसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असा माझा सवाल आहे. त्यामुळे सदाभाऊंनी मुलाला निवडणूकीत उभे केले हे मला पटलेले नाही. कांही इथिक्स पाळून मी राजकारण करतो, त्यामध्ये हे माझ्या मनांला हे पटत नाही. सदाभाऊंनी आपल्या मुलाला उमदेवारी देवून पक्षात घराणेशाही आणली.’खासदार शेट्टी म्हणाले,‘राज्यातील सरकारबद्दल लोकांत अस्वस्थता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे बदलतील की काय अशी शक्यता वाटत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे मत प्रदर्शित होईल त्यावर भविष्यातील राजकारणाची दिशा निश्चित करू. आम्ही नेहमीच जनमताचा आदर केला आहे. त्यामुळे निकालाचे चिंतनही आम्ही जरूर करू. राज्यातील लोकशाही आघाडीचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी कांही तात्विक मतभेद असतानाही त्यावेळी भाजप सोबत गेलो. परंतु, हे सरकारच जर का शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार नसेल तर त्या अस्वस्थेचीही दखल घ्यावी लागेल. सदाभाऊ हे संघटनेचे प्रतिनिधी म्हणून ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही संघटनेने त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली. त्यामुळे संघटनेने सत्तेबाबत कांही वेगळा निर्णय घेतला तर तो सदाभाऊंनाही मान्य करावा लागेल.’