शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

बारावीचा निकाल ८६.६० टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी

By admin | Updated: May 25, 2016 12:39 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत राज्याचा एकूण निकाल ८६.६० टक्के इतका लागला आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २५ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून राज्याचा एकूण निकाल ८६.६० टक्के लागला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी परीक्षेत बाजी मारली असून एकूण ९०.५० टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ८३.४६ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९३.२९ टक्के तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८३. ९९ टक्के लागला.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत १८ फेब्रुवारी ते २८ मार्च २०१६ या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांपैकी ११ लाख ४२ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या ५ लाख ३२ हजार ४८२ असून मुलांची संख्या ६ लाख १० हजार ४०० एवढी आहे.
विज्ञान विभागाचा निकाल ९३.१६ टक्के, वाणिज्य विभागाचा निकास ८९.१० टक्के तर कला विभागाचा निकाल ७८.११ टक्के इतका लागला. एकूण १६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली त्यामधे १० विषयांचा निकाल १०० टक्के लागला. ९ जुलै रोजी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. 
 
राज्य मंडळातर्फे आज दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल प्रसिध्द केला जाईल. विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत येत्या ३ जून  रोजी दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात वितरित केली जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 

या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध

www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.rediff.com/exams
http://maharashtra12.jagranjosh.com
http://maharashtra12.knowyourresult.com

 

मोबाइलवर कसा पाहावा निकाल

bsnl : mhhsc send sms 57766
Airtel : Mah12 send sms 520711

Idea, Vodafone, Reliance सह इतर मोबाइलधारकांनी  Mah12  टाईप करून 58888111 या क्रमांकावर एमएसएस करावा.

विभागीय मंडळ निहाय निकाल :
 पुणे - ८७.२६%
 कोल्हापूर - ८८.१०%
 मुंबई- ८६.०८%
 नागपुर- ८६.३५%
 अमरावती - ८५.८१%
 औरंगाबाद - ८७.८०%
 नाशिक - ८३.९९%
 लातूर - ८६.२८%
 कोकण - ९३.३१%
 
  

नागपूरच्या निकालात घट

इतर वर्षांच्या तुलनेत यंदा नागपूर विभागाचा निकाल कमी लागला आहे. संपूर्ण विभागाच्या निकालाची आकडेवारी ८६.३५ टक्के इतकी असून विभागाने राज्यात पाचवे स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ५.७६ टक्क्यांची घट झाली आहे.