शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

कसा राहणार पोलिसांवर भरोसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 20:59 IST

मागील वर्षी ज्येष्ठ नागरिकांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर हादरले होते.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - मागील वर्षी ज्येष्ठ नागरिकांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर हादरले होते. गेल्या काही काळापासून ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र तरीदेखील पोलीस प्रशासनाने यातून बहुतेक धडा घेतलेला नाही. म्हणूनच की काय भरोसा सेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी अवघ्या तीन जणांचा स्टाफकार्यरत आहे. विशेष म्हणजे शहरात लाखो ज्येष्ठ नागरिक असताना मागील सव्वापाच वर्षांत केवळ साडेतीन हजारांच्या आसपासच नागरिकांचे कार्ड तयार करण्यात आले आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडे विचारणा केली होती. भरोसा सेलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले कार्ड तसेच दामिनी पथकाला देण्यात आलेल्या सुविधा इत्यादींबाबत त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी भरोसा सेलमध्ये केवळ एक अधिकारी व दोन कर्मचारी कार्यरत आहेत. भरोसा सेलतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विशेष कार्ड देण्यात येते. १ जानेवारी २०१२ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत पोलीस विभागातर्फे केवळ ३,६६२ ज्येष्ठ नागरिक कार्ड वितरित करण्यात आले. तर या कालावधीत केवळ ३७२ नागरिकांना प्रत्यक्ष मदत देण्यात आली. मागील पाच वर्षात चक्क ३८ ज्येष्ठ नागरिकांची हत्या करण्यात आली. तर फसवणूक व मारहाणीचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात येईल, असा दावा अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला होता.अशा स्थितीत माहितीच्या अधिकारातील ही आकडेवारी पोलिसांच्या दाव्यांची पोलखोल करणारीच आहे.दामिनी पथकासाठी केवळ चार गाड्यामहिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांमध्ये २०११ पासून विशेष पथक कार्यरत आहे. २०१६ साली याला दामिनी पथक असे नाव देण्यात आले. शहरात छेडखानी, महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने होत असतात. अशा घटना थांबविण्याची जबाबदारी दामिनी पथकावर आहे. हे पथक शहरभरात सातत्याने फिरतीवर राहणे अपेक्षित आहे. मात्र या पथकाकडे केवळ चार वाहने असून प्रत्येक गाडीवर चार व एका गाडीवर तीन असे केवळ १५ कर्मचारी याअंतर्गत कार्यरत आहे. १ जानेवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत महिला व तरुणींची छेडखानी करणाऱ्या १,३५९ जणांवर कारवाई करण्यात आली.