शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कशी थांबेल वीजचोरी

By admin | Updated: January 20, 2015 01:20 IST

वीज कायदा-२००३ अंतर्गत मोडणाऱ्या गुन्ह्यांसाठी संपूर्ण विदर्भात केवळ एकच पोलीस ठाणे आहे. नागपुरातील गड्डीगोदाम येथे महावितरण कार्यालयाच्या परिसरात हे पोलीस ठाणे आहे.

हायकोर्टाची दखल : वीज गुन्ह्यांसाठी विदर्भात एकच पोलीस ठाणेनागपूर : वीज कायदा-२००३ अंतर्गत मोडणाऱ्या गुन्ह्यांसाठी संपूर्ण विदर्भात केवळ एकच पोलीस ठाणे आहे. नागपुरातील गड्डीगोदाम येथे महावितरण कार्यालयाच्या परिसरात हे पोलीस ठाणे आहे. यामुळे वीज चोरी व इतर गुन्ह्यांवर वचक कसा बसेल हा प्रश्न आहे. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन हे प्रकरण जनहित याचिका म्हणून स्वीकारले आहे. एका फौजदारी अर्जावरील सुनावणीदरम्यान याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. न्यायालयाने ही बाब गृह विभागाचे प्रधान सचिव व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांच्यापर्यंत पोहोचवून यासंदर्भात काय करता येईल याची माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. सध्याच्या एकमेव पोलीस ठाण्यावर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती व अकोला या नऊ जिल्ह्यांचा भार आहे. नऊ जिल्ह्यातील वीजचोरीचे गुन्हे या पोलीस ठाण्यात नोंदवले जातात. दर महिन्याला सरासरी २०० गुन्ह्यांची नोंद होते. धाड टाकून वीजचोरी पकडणे, घटनेचा पंचनामा करणे व जप्ती कारवाई करणे या जबाबदाऱ्या वीज अधिकाऱ्यांकडे आहेत. यानंतर ते वीज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतात. येथून वीज पोलीस ठाण्याचे कार्य सुरू होते. संबंधितावर गुन्हा नोंदवणे, आवश्यकता पडल्यास अटक करणे व शेवटी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे ही त्यांची कामे आहेत. तपास अधिकाऱ्याला दिलेल्या तारखेवर न्यायालयातही हजर रहावे लागते. कामाची ही काहिली अंगभर होत असल्याची तक्रार पोलीस नेहमीच करीत असतात. गुन्ह्यांचे प्रमाण पाहता प्रत्येक जिल्ह्यात एक पोलीस ठाणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)