शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

कशी थांबेल वीजचोरी

By admin | Updated: January 20, 2015 01:20 IST

वीज कायदा-२००३ अंतर्गत मोडणाऱ्या गुन्ह्यांसाठी संपूर्ण विदर्भात केवळ एकच पोलीस ठाणे आहे. नागपुरातील गड्डीगोदाम येथे महावितरण कार्यालयाच्या परिसरात हे पोलीस ठाणे आहे.

हायकोर्टाची दखल : वीज गुन्ह्यांसाठी विदर्भात एकच पोलीस ठाणेनागपूर : वीज कायदा-२००३ अंतर्गत मोडणाऱ्या गुन्ह्यांसाठी संपूर्ण विदर्भात केवळ एकच पोलीस ठाणे आहे. नागपुरातील गड्डीगोदाम येथे महावितरण कार्यालयाच्या परिसरात हे पोलीस ठाणे आहे. यामुळे वीज चोरी व इतर गुन्ह्यांवर वचक कसा बसेल हा प्रश्न आहे. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन हे प्रकरण जनहित याचिका म्हणून स्वीकारले आहे. एका फौजदारी अर्जावरील सुनावणीदरम्यान याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. न्यायालयाने ही बाब गृह विभागाचे प्रधान सचिव व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांच्यापर्यंत पोहोचवून यासंदर्भात काय करता येईल याची माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. सध्याच्या एकमेव पोलीस ठाण्यावर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती व अकोला या नऊ जिल्ह्यांचा भार आहे. नऊ जिल्ह्यातील वीजचोरीचे गुन्हे या पोलीस ठाण्यात नोंदवले जातात. दर महिन्याला सरासरी २०० गुन्ह्यांची नोंद होते. धाड टाकून वीजचोरी पकडणे, घटनेचा पंचनामा करणे व जप्ती कारवाई करणे या जबाबदाऱ्या वीज अधिकाऱ्यांकडे आहेत. यानंतर ते वीज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतात. येथून वीज पोलीस ठाण्याचे कार्य सुरू होते. संबंधितावर गुन्हा नोंदवणे, आवश्यकता पडल्यास अटक करणे व शेवटी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे ही त्यांची कामे आहेत. तपास अधिकाऱ्याला दिलेल्या तारखेवर न्यायालयातही हजर रहावे लागते. कामाची ही काहिली अंगभर होत असल्याची तक्रार पोलीस नेहमीच करीत असतात. गुन्ह्यांचे प्रमाण पाहता प्रत्येक जिल्ह्यात एक पोलीस ठाणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)