शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

स्वाभिमानी मुख्यमंत्री मातोश्रीवर कसे?

By admin | Updated: May 21, 2017 01:31 IST

विधिमंडळात जीएसटीचे बिल आणण्याआधीच सरकारने या बिलाचा मसुदा ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांना दाखवला. पारदर्शी कारभाराच्या गोष्टी करणाऱ्या स्वाभिमानी

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विधिमंडळात जीएसटीचे बिल आणण्याआधीच सरकारने या बिलाचा मसुदा ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांना दाखवला. पारदर्शी कारभाराच्या गोष्टी करणाऱ्या स्वाभिमानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे असे घटनाबाह्य सत्ताकेंद्र चालते का? निवडणुकीच्या काळात वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा केली आणि आता मातोश्रीवर जाऊन वाघाला खाऊ घालून आलात, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सरकारवर कडाडून टीका केली. २७ महापालिकांच्या कर्त्याधर्त्यांना बोलावून, त्यांचा एक मेळावा घेऊन तुम्ही सांगितले असते, तर राज्यात सरकार आहे असे वाटले असते, पण तुम्ही मातोश्रीवर गेलात, राज्याचे सरकार बिलांचा मसुदा घेऊन तेथे गेल्याने, राज्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ऐकविले. भाजपाला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मतांची बेगमी हवी आहे, म्हणून हे सगळे चालले आहे, पण त्यामुळे राज्याची प्रतिष्ठा गेली, असेही ते म्हणाले. पाटील यांचे भाषण पहिल्या दिवशी चर्चेचा विषय बनले होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पाटील यांच्या भाषणावर आक्षेप घेतला, तेव्हा ‘खाली बसा, मी तुमची शक्तीच सांगतोय,’ असे पाटील म्हणाले. मुंबई महापालिकेला फक्त ८ टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. मुंबईची वाढ ८ टक्केच होणार, हे कशाच्या आधारे तुम्ही गृहीत धरले, शिवसेनेने जर चांगले काम केले आणि मुंबईची वाढ १५ टक्के झाली, तरी त्यांना ८ टक्केच वाढ देऊन, तुम्ही मुंबई महापालिकेचे नुकसान करत आहात, असे चिमटेही त्यांनी काढले.