शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

स्वाभिमानी मुख्यमंत्री मातोश्रीवर कसे?

By admin | Updated: May 21, 2017 01:31 IST

विधिमंडळात जीएसटीचे बिल आणण्याआधीच सरकारने या बिलाचा मसुदा ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांना दाखवला. पारदर्शी कारभाराच्या गोष्टी करणाऱ्या स्वाभिमानी

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विधिमंडळात जीएसटीचे बिल आणण्याआधीच सरकारने या बिलाचा मसुदा ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांना दाखवला. पारदर्शी कारभाराच्या गोष्टी करणाऱ्या स्वाभिमानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे असे घटनाबाह्य सत्ताकेंद्र चालते का? निवडणुकीच्या काळात वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा केली आणि आता मातोश्रीवर जाऊन वाघाला खाऊ घालून आलात, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सरकारवर कडाडून टीका केली. २७ महापालिकांच्या कर्त्याधर्त्यांना बोलावून, त्यांचा एक मेळावा घेऊन तुम्ही सांगितले असते, तर राज्यात सरकार आहे असे वाटले असते, पण तुम्ही मातोश्रीवर गेलात, राज्याचे सरकार बिलांचा मसुदा घेऊन तेथे गेल्याने, राज्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ऐकविले. भाजपाला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मतांची बेगमी हवी आहे, म्हणून हे सगळे चालले आहे, पण त्यामुळे राज्याची प्रतिष्ठा गेली, असेही ते म्हणाले. पाटील यांचे भाषण पहिल्या दिवशी चर्चेचा विषय बनले होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पाटील यांच्या भाषणावर आक्षेप घेतला, तेव्हा ‘खाली बसा, मी तुमची शक्तीच सांगतोय,’ असे पाटील म्हणाले. मुंबई महापालिकेला फक्त ८ टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. मुंबईची वाढ ८ टक्केच होणार, हे कशाच्या आधारे तुम्ही गृहीत धरले, शिवसेनेने जर चांगले काम केले आणि मुंबईची वाढ १५ टक्के झाली, तरी त्यांना ८ टक्केच वाढ देऊन, तुम्ही मुंबई महापालिकेचे नुकसान करत आहात, असे चिमटेही त्यांनी काढले.