शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

दोन दिवसांत कर्ज फेडायचे कसे?

By admin | Updated: June 30, 2017 01:22 IST

शेतकऱ्यांनी २०१६-१७मध्ये घेतलेल्या कर्जाची शुक्रवार, ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत:

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांनी २०१६-१७मध्ये घेतलेल्या कर्जाची शुक्रवार, ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत: परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने शुक्रवारपर्यंत एकदम पैसा भरायचा कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ३० जूनची मुदत वाढवून, किमान १५ जुलैपर्यंत तरी करावी, अशी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या मुदतवाढीचा निर्णय सहकार विभागाने गुरुवार सायंकाळपर्यंत घेतलेला नव्हता. मुदतीच्या शेवटच्या दिवशी (३० जून) किती शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड केली जाते, याचा अभ्यास करून मुदतवाढ देण्याबाबतचा विचार केला जाईल, असे एका ज्येष्ठ मंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कर्जमाफीचा शासकीय निर्णय २८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला अन् ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली. एवढा पैसा दोन दिवसांत उभारण्याची शेतकऱ्यांची आर्थिक कुवत नाही.आधारसंलग्न कर्जमाफी-या आधी २००९मध्ये दिलेल्या कृषी कर्जमाफीमध्ये अनेक घोटाळे झाले होते. बोगस लाभार्थी दाखवून पैसा उचलण्यात आला. यावेळी कर्जमाफीची रक्कम ही आधार संलग्न करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की, खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे.‘अवघ्या ८ हजार कोटींची कर्जमाफी’छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक चालविली आहे. कर्जमाफीसंदर्भात खाटे आकडे, जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या परिघाबाहेर फेकले गेले आहेत. कर्जमाफीसाठीच्या अटी व कालावधी पाहता प्रत्यक्षात अवघ्या ८ हजार कोटींचीच कर्जमाफी असल्याचा दावा काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.