शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

दोन दिवसांत कर्ज फेडायचे कसे?

By admin | Updated: June 30, 2017 01:22 IST

शेतकऱ्यांनी २०१६-१७मध्ये घेतलेल्या कर्जाची शुक्रवार, ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत:

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांनी २०१६-१७मध्ये घेतलेल्या कर्जाची शुक्रवार, ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत: परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने शुक्रवारपर्यंत एकदम पैसा भरायचा कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ३० जूनची मुदत वाढवून, किमान १५ जुलैपर्यंत तरी करावी, अशी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या मुदतवाढीचा निर्णय सहकार विभागाने गुरुवार सायंकाळपर्यंत घेतलेला नव्हता. मुदतीच्या शेवटच्या दिवशी (३० जून) किती शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड केली जाते, याचा अभ्यास करून मुदतवाढ देण्याबाबतचा विचार केला जाईल, असे एका ज्येष्ठ मंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कर्जमाफीचा शासकीय निर्णय २८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला अन् ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली. एवढा पैसा दोन दिवसांत उभारण्याची शेतकऱ्यांची आर्थिक कुवत नाही.आधारसंलग्न कर्जमाफी-या आधी २००९मध्ये दिलेल्या कृषी कर्जमाफीमध्ये अनेक घोटाळे झाले होते. बोगस लाभार्थी दाखवून पैसा उचलण्यात आला. यावेळी कर्जमाफीची रक्कम ही आधार संलग्न करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की, खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे.‘अवघ्या ८ हजार कोटींची कर्जमाफी’छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक चालविली आहे. कर्जमाफीसंदर्भात खाटे आकडे, जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या परिघाबाहेर फेकले गेले आहेत. कर्जमाफीसाठीच्या अटी व कालावधी पाहता प्रत्यक्षात अवघ्या ८ हजार कोटींचीच कर्जमाफी असल्याचा दावा काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.