शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती खोट्या केसेस टाकणार आहात?

By admin | Updated: May 29, 2016 01:22 IST

आम्ही निर्दोष आहोत, हे न्यायालयात सिद्ध होईपर्यंत तुरुंगवास आणि आमचे आयुष्य संपावे, नव्हे संपूर्ण भुजबळ कुटुंब संपावे असे प्रयत्न सर्व पातळ्यांवर आमचे विरोधक करीत आहेत. ५० वर्षांची

मुंबई : आम्ही निर्दोष आहोत, हे न्यायालयात सिद्ध होईपर्यंत तुरुंगवास आणि आमचे आयुष्य संपावे, नव्हे संपूर्ण भुजबळ कुटुंब संपावे असे प्रयत्न सर्व पातळ्यांवर आमचे विरोधक करीत आहेत. ५० वर्षांची आमची राजकीय आणि सामाजिक कारकिर्द आज पणाला लागलेली आहे. या वयात आम्ही किती आणि कसे लढावे हा प्रश्न आहे. बाहेर वाटेल ते आरोप करणे, बातम्या देणे सुरू आहे. त्याला तुरुंगातून उत्तर देऊ; पण आणखी किती खोट्या केसेस टाकणार आहात, असा उद्विग्न सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे.राज्य शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फिर्याद दाखल केल्याचे वृत्त आले आहे. आम्ही नियमितपणे आयकर विभागाला आमच्या उत्पन्नाची विवरणपत्रे सादर केलेली आहेत. तज्ज्ञांकडून पूर्ण अभ्यासाअंती याबाबत आम्ही माहिती घेतली असता असे निदर्शनास आले की, आमची मालमत्ता पूर्णत: नियमात बसणारी आहे. त्याबाबतचा सर्व व सखोल तपशील लाचलुचपत विभागाला चौकशीच्या वेळी सादर केला आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणात, अतिरिक्त चटई निर्देशांक (एफएसआय) वापरण्याची परवानगी देऊन मिळणाऱ्या १०० कोटी रुपयांतून महाराष्ट्र सदन, हायमाउंट गेस्ट हाउस, आरटीओची इमारत, प्रकल्पग्रस्तांसाठी कायमस्वरूपी निवारा इत्यादी बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीचा आहे. याबाबत लाचलुचपत विभागाचे म्हणणे असे आहे की, या प्रकल्पातून आम्हाला ८०० कोटी रुपये भ्रष्टाचारात मिळाले. परंतु वास्तव हे आहे की, चमणकरांना शासनाकडून एक इंच जमीन, एफएसआय किंवा एक रुपयाही मिळालेला नाही. असे असतानाही आम्हाला मात्र ८०० कोटी रुपयांची लाच मिळाल्याचे गृहीत धरून आमच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई सुरू केली. केसेस केल्या आणि मालमत्ताही जप्त करायची सुरुवात केली आहे, असेही भुजबळ यांनी हाती लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

एसीबीने उपस्थित केलेल्या सर्व शंकांना आणि प्रश्नांना उत्तरेही दिलेली आहेत. परंतु नियमानुसार आमच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये ज्या गोष्टी धरावयास नको, अशा काल्पनिक गोष्टी गृहीत धरून केसेस केल्या जात आहेत, असे भुजबळ यांचे म्हणणे आहे.