शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा दीड महिना कसा सुसह्य करणार?

By admin | Updated: May 4, 2016 04:48 IST

राज्यात भयंकर दुष्काळ असताना पुढील दीड महिना राज्य सरकार या स्थितीशी कशा प्रकारे सामना करणार? आणीबाणीच्या स्थितीत राज्य सरकारचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ काय असणार

मुंबई : राज्यात भयंकर दुष्काळ असताना पुढील दीड महिना राज्य सरकार या स्थितीशी कशा प्रकारे सामना करणार? आणीबाणीच्या स्थितीत राज्य सरकारचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ काय असणार आहे? याची सविस्तर माहिती आम्हाला द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले आहेत.आयपीएलमध्ये करण्यात येणाऱ्या पाणी वापराविरोधात लोकसत्ता मूव्हमेंट या एनजीओने तर कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याविरुद्ध पुण्याचे प्राध्यापक एच.एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या दोन्ही याचिकांवर न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे एकत्रितपणे सुनावणी घेण्यात आली. या वेळी खंडपीठाने राज्य सरकार जल धोरणाची अंमलबजावणी करणार का, अशी विचारणा केली. ‘केवळ आयपीएल हलवून समस्या सुटणार नाही. जल धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मे व जून महिन्यातील परिस्थितीशी कसा सामना करणार? सरकारने या स्थितीला हाताळण्यास काय उपाययोजना आखल्या? आतापर्यंत दुष्काळ का जाहीर केला नाही? केंद्र सरकारकडून का आर्थिक मदत मागत नाही?’ अशी प्रश्नांची सरबत्तीच उच्च न्यायालयाने सरकारवर केली. त्यावर हंगामी महाधिवक्ता रोहित देव यांनी दुष्काळसदृश गावांना आवश्यक ती मदत सरकार पुरवत आहे. तसेच केंद्र सरकारने सुमारे अडीच हजार कोटी रुपये निधी दिल्याची माहिती दिली.इमारतींना परवानगीपूर्वी ‘रेन हार्वेस्टिंग’ बंधनकारक राज्यात यापुढे अशा प्रकारे भीषण पाणीटंचाई उद्भवू नये, यासाठी खंडपीठाने राज्य सरकारला यापुढे नव्या इमारतींना बांधकामांची परवानगी देताना रेन हार्वेस्टिंग बंधनकारक करण्याचे निर्देश द्या, अशी सूचना केली. मुंबईत अशी सक्ती करण्यात आली आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने महापालिकेचे वकील सुरेश पाकळे यांच्याकडे केली. त्यावर अ‍ॅड. पाकळे यांनी नव्या बांधकामांना आयओडी देताना त्यात ही अट घातल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्येही नव्या बांधकामांना परवानगी देताना ही अट बंधनकारक करा, अशी सूचना खंडपीठाने सरकारला केली.खंडपीठाने महापालिकेकडे टँकरला मिळणाऱ्या पाण्याचा स्रोत काय आहे, याची चौकशी केली का, अशी विचारणा केली. ‘टँकरला पाणी कोठून मिळते? पैसे देऊन टँकरचे पाणी घेता येते? हे पाणीचोरी तर केले जात नाही ना?’ असे प्रश्न खंडपीठाने महापालिकेला विचारले. त्यावर टँकरवाले विहिरींमधून पाणी घेतात. विहिरींवर आपले नियंत्रण नाही. राज्य सरकारचे यावर नियंत्रण आहे. महापालिकेच्या जलाशयातून पाणी देण्यात येत नाही, अशी माहिती अ‍ॅड. पाकळे यांनी खंडपीठाला दिली.मराठवाड्यात १० वर्षांतील नीचांकी पाणीसाठा- राज्यातील मोठ्या, मध्यम, लघू अशा २,५५९ प्रकल्पांमध्ये २९ एप्रिलअखेर ६,०९३ दलघमी पाणीसाठा (सरासरी १६ टक्के) शिल्लक आहे. - २०१४ च्या तुलनेत हा जलसाठा निम्मा आहे. तर मराठवाड्यातील ८४३ प्रकल्पांत केवळ २ टक्के म्हणजे अवघे १९० दलघमी इतकेच उपयुक्त पाणी उरले आहे. मागील १० वर्षांतील हा नीचांकी साठा आहे.