शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

नक्की पुस्तके मिळणार कशी?

By admin | Updated: February 6, 2017 02:36 IST

शालेय पाठ्यपुस्तकांसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचा निर्णय मागे घेत शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात थेट पुस्तके मिळणार असल्याचे जाहीर केले होते

मुंबई: शालेय पाठ्यपुस्तकांसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचा निर्णय मागे घेत शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात थेट पुस्तके मिळणार असल्याचे जाहीर केले होते. या निर्णयाला काही दिवस उलटले असले तरीही गोंधळ कमी झालेला नाही. मुंबईतील काही महापालिका शाळांमध्ये बँक खाते उघडण्यासाठी शाळेत कागदपत्रे जमा करण्याचे फलक झळकत असल्याने विद्यार्थी- पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शाळेत लावलेल्या फलकांमुळे शिक्षकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत आणि थेट त्यांच्या हातात दिली जात होती. तथापि, राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचे पैसे यापुढे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील असे फर्मान काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काढले होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण, शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला अनेक स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर एकूण परिस्थितीचा विचार करुन तावडे यांनी या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले होते. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके ही त्यांना थेट त्यांच्या हातातच देण्यात येणार आहेत. त्यासाठी बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार नाहीत. पण, या पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त लागणाऱ्या अन्य पुस्तकांचे पैसे बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होत. या स्पष्टीकरणानंतर शिक्षक आणि मुख्याध्यापक निर्धास्त झाले होते. पण, काही महापालिका शाळांत पाठ्यपुस्तकांच्या पैशासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यासाठी कागदपत्रे जमा करण्याचे फलक लागल्याने पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला असून हा विषय चर्चेत आला आहे. तावडे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या निर्णयाचे कोणत्याही प्रकारचे परिपत्रक काढण्यात आलेले नाही. त्यामुळे शाळांनी बँक खाती उघडण्याचे सत्र सुरु केले आहे. शाळांकडे लेखी स्वरुपात काहीच नसल्याने बँक खाते उघडावे लागणार असे शाळांचे मत आहे. पण, या प्रकारात काही शाळांनी शिक्षण विभागावरच टीका केली आहे. सुरु असलेल्या गोंधळ सुटण्यासाठी शिक्षण विभाग आता कोणती घोषणा करेल आणि कधी करेल याकडे शाळांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)