शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

कालचे दरोडेखोर आजचे मित्र कसे?

By admin | Updated: May 5, 2015 01:12 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा बँक, राज्य बँक, महानंद, साखर कारखान्यात केलेल्या घोटाळ्यांचे ट्रॅक्टरभर पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा बँक, राज्य बँक, महानंद, साखर कारखान्यात केलेल्या घोटाळ्यांचे ट्रॅक्टरभर पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा नेत्यांनी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला होता. आता सत्तेवर आल्यानंतर ते पुरावे कुठे गेले, का त्याची रद्दी घातली, असा सवाल करीत राज्यात विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. भाजपा आयतेच सत्तेवर आले असून, त्यांना सहकारातील कालचे दरोडेखोर आता मित्र वाटू लागले आहेत, अशी खरमरीत टीका खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी सांगलीत केली. ‘एफआरपी’साठी सोमवारपासून राज्यभर सहकारमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाचे रणशिंगही फुंकले. स्वाभिमानी संघटनेच्यावतीने रविवारी येथे झालेल्या साखर परिषदेत ते बोलत होते. खा. शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या अटीवर भाजपा सरकारला पाठिंबा दिला होता; पण आमचा भ्रमनिरास झाल्याचे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पैशावर उभे राहिलेले ‘वसंतदादा शुगर’ हे शरद पवार यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे वृद्धाश्रम झाले आहे. या इन्स्टिट्यूटचा शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही. उलट तेथील शास्त्रज्ञांनी उसाच्या विविध जातींना विरोधच केला आहे. लोकरी माव्यावर प्रतिबंध घालण्यास या शास्त्रज्ञांना का अपयश आले, याचे उत्तर पवारांनी द्यावे. पुढील १० वर्षांतील साखर उद्योगाच्या रोडमॅपचे नियोजन केले; पण त्यात शेतकरी, शेतमजूर, साखर कामगारांना स्थान नव्हते. शरद पवार कृषिमंत्री असताना सहकारी कारखाने खासगी झाले. तेव्हा त्यांनी हे कारखाने वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. भाजपाने एफआरपीच्या नादी लागू नये, त्यांची गाठ शेतकऱ्यांशी आहे, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)