शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

संजय दत्तचे उदात्तीकरण किती योग्य?

By admin | Updated: February 25, 2016 21:12 IST

शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर अभिनेता संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगातून मुंबईत परत आला तेव्हा जणू काही तो फार मोठी कामगिरी फत्ते करून आला आहे, अशा थाटात त्याचे स्वागत झाले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ - शिक्षा भोगून पूर्ण झाल्यावर अभिनेता संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगातून मुंबईत परत आला तेव्हा जणू काही तो फार मोठी कामगिरी फत्ते करून आला आहे, अशा थाटात त्याचे स्वागत झाले. एवढे कशाला तुरुंगातून बाहेर पडल्यावर संजय दत्तने तेथील मातीला नमन करून तिरंग्या झेंड्याला सॅल्युट ठोकल्याचे जे दृश्य टीव्हीवर दिसले तेही खरे तर त्याच्या एका आगामी चित्रपटाचे पद्धतशीर आयोजित केलेले चित्रिकरण होते. म्हणजेच एक गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगून संजय दत्तच्या घरवापसीचे केवळ उदात्तीकरणच नव्हे तर व्यापारीकरणही केले गेले.

असे उदात्तीकरण कितपत योग्य असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिक्षा भोगून पूर्ण झालेला कैदी या नात्याने संजय दत्त व याकूब मेमन या दोघांमध्ये फरक काय? दोघांनाही मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा झाली होती. संजय दत्तचा तुरुंगवासाचा निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यावर त्याची शिक्षा पूर्ण झाली. तसेच गळ््याभोवती फास आवळला जाऊन प्राण गेले तेव्हा याकूब मेमनची शिक्षा पूर्ण झाली होती.

असे असले तरी याकूब प्रेत दफनविधीसाठी कुटुंबियांच्या हवाली करायचे की नाही याचा निर्णय करताना इतर गोष्टींबरोबरच त्याचे उदात्तीकरण होणार नाही, याचा विचार केला गेला. नव्हे त्याच्या कुटुंबियांकडून तशी अलिखित हमी घेऊनच मृतदेह ताब्यात देण्यात आला. तरीही अंत्ययात्रेच्या वेळी माहिमला मोठा जनसमुदाय जमला तेव्हा अनेकांच्या कपाळावर अठ्या चढल्या होत्या.

 

मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याच्या वेळी पोलीस व लष्कराच्या कारवाईत ठार झालेल्या कसाबच्या नऊ सहकाऱ्यांच्या पार्थिवांचेही गुपचूप दफन केले गेले. कुठे दफन केले हे कळले तर कदाचित देशविघातक शक्तींसाठी ते स्फूर्तिस्थान व तीर्थस्थळ ठरेल, हा त्यामागचा विचार होता. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला ठार मारले व त्याच्या मृतदेहाची समुद्रात अज्ञातस्थळी विल्हेवाट लावली. यामागचा हेतूहू तोच होता. मग संजय दत्तच्या बाबतीतही ही खबरदारी का घेतली नाही? एक सेलिब्रिटी म्हणून?