शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

रुग्णालयच अत्यवस्थ!

By admin | Updated: June 8, 2017 01:05 IST

तीर्थक्षेत्र जेजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही धोकादायक इमारतीत असून तिथे रुग्णांसाठी अपुऱ्या सुविधा आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या व पुणे-पंढरपूर पालखी सोहळ्याच्या मार्गावर असणाऱ्या महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र जेजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही धोकादायक इमारतीत असून तिथे रुग्णांसाठी अपुऱ्या सुविधा आहेत. प्रशासनातील समन्वयाभावी इमारतीचे काम रखडले आहे. ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळून ११ वर्षांचा काळ लोटला असला तरी अजूनही जुन्या जीर्ण झालेल्या, मोडकळीस आलेल्या आणि पावसाळ्यात गळत असलेल्या धोकादायक इमारतीमध्ये अपुऱ्या सुविधेमध्ये रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत. अपघातामधील जखमींना व अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आसरा अथवा पुणे येथील ससून रुग्णालयाची वाट धरावी लागते. रुग्णालयात महिन्याला साधारणपणे साडेतीन ते चार हजार रुग्णांवर उपचार केले जातात. ३० बेडचे रुग्णालय मंजूर असताना केवळ इमारत नसल्याने केवळ सात बेडवर रुग्णालय चालवावे लागते. २०११-१२ मध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला असला तरी गेल्या दीड वर्षापासून हे काम बंद आहे. सुमारे ७० टक्के काम झाले असले तरी बांधकाम व इतर सोई-सुविधा निर्माण करून प्रत्यक्षात नूतन इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित होण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींना कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल आता विचारण्यात येऊ लागला आहे. एप्रिल २००६ मध्ये तत्कालीन आमदार अशोक टेकवडे यांच्या प्रयत्नामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा दिला. वास्तविक २०१३-१४ मध्ये काम पूर्ण होऊन नवीन इमारतीमध्ये रुग्णालय स्थलांतरित होणे अपेक्षित होते; मात्र दुर्दैवाने आजतागायत ९० टक्के इमारतीचे काम झाले असून, गेल्या दोन वर्षांपासून तर काम ठप्पच आहे.रुग्णालयाच्या कामाची उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, पुरंदर, आर. पी. आय.च्या वतीने ग्रामीण रुग्णालयाचे काम त्वरित पूर्ण करून जुन्या इमारतीतील ग्रामीण रुग्णालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी रुग्णालयासमोरच जागरण गोंधळ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी करून लवकरात लवकर रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याची आश्वासने दिली आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही वस्तुस्थितीची पाहणी करून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्यात ४ कोटी १८ लाख खर्चून मुख्य इमारतीचे काम करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात ४ कोटी ५५ लाख रुपयांची शवविच्छेदन इमारत, पार्किंग, वीज, पाणीपुरवठा, लिफ्ट जनरेटर, तसेच फर्निचरची कामे करावयाची आहेत, तर तिसऱ्या टप्प्यात ३ कोटी ६९ लाख रुपये खर्चून अधिकारी, कर्मचारी निवासस्थान इमारतींची कामे करावयाची आहेत. या सर्व कामांसाठी शासनाने संपूर्ण निधी वर्ग केलेला आहे. याचाच अर्थ इमारतीच्या संपूर्ण कामाचे पैसे प्राप्त होऊनही काम रखडलेल्या अवस्थेत राहिले आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता आतापर्यंत आपणास १० कोटी २५ लाख रुपयांची बिले मिळाली आहेत. उर्वरित काम आपण दोन महिन्यांत पूर्ण करणार आहोत. मात्र सार्वजनिक बांधकामकडून सहकार्य होत नसल्याचीच तक्रार केली आहे. कामाची बिले अदा; तरीही काम रखडलेलेदुसरीकडे पालिकेकडून रुग्णालयाला केवळ जागा देणे होते, ती दिलेली आहे. सार्वजनिक विभागाकडूनही केलेल्या कामाची बिले अदा करण्यात आलेली आहेत.तरीही काम रखडले आहे. समन्वय नसल्यानेच काम रखडलेले निदर्शनास येत आहे.