शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

फळबागांसाठी सामूहिक शेततळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2015 01:48 IST

फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सामुहिक शेततळे देण्यात येणार

- विवेक चांदूरकर, वाशिम

फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सामुहिक शेततळे देण्यात येणार आहे. याकरिता फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना सामुहिक अर्ज कृषी विभागाकडे करावा लागणार असून, फळबागांच्या क्षेत्रफळानुसार शेततळे मंजूर करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे फळबागा कमी आहेत. पश्चिम महाराष्ट्रात धरणांसह विहिरी, तलाव व शेततळ्यांवर आधारीत सिंचन करण्यात येत असल्याने द्राक्ष, डाळींब, मोसंबीच्या फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत.त्यातुलनेत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरडवाहू आणि खारपाणपट्टा असल्यामुळे सिंचन करण्यात येत नाही. त्यामुळे फळबाग नाहीत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी काही प्रमाणात असलेल्या संत्रा व केळीच्या फळबागही आता कमी होत आहे. त्यामुळे यामध्ये वाढ करण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध नाविण्यपूर्ण योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना समुहिक शेततळे देण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी फळबाग असलेल्या चार ते पाच शेतकऱ्यांना एक गट स्थापन करावा लागणार आहे. या शेतकऱ्यांना चार शेतांच्या मध्यभागी शेततळे देण्यात येईल. हे शेततळे १०० टक्के अनुदानावर असून, शेतकऱ्यांना खर्च करावा लागणार नाही. शेततळ्याचा आकार हा फळबागांच्या क्षेत्रफळावर अवलंबून राहणार आहे. पावसाळा व हिवाळ्यात विहिरी किंवा धरणांमध्ये जलसाठा असल्यामुळे सिंचन करता येते. मात्र उन्हाळ्यात साठा संपल्यावर पाणी नसल्याने फळबागा सुकतात. उन्हाळ्यात शेततळ्यातील पाणी फळबागांना दिल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होवू शकतो. त्यादृष्टीनेच शासनाने प्लॅस्टीकची पन्नी असलेले शेततळे १०० टक्के अनुदानावर देण्याची योजना सुरू केली आहे.सामूहिक फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्लॅस्टिकची पन्नी असलेले शेततळे देण्यात येणार आहे. १० लाख ते १ कोटी लिटर पाणी धारण क्षमता असलेले शेततळे या योेजनेंतर्गत देण्यात येईल. शेतकऱ्यांकडे असलेल्या फळबागांना किती पाण्याची गरज आहे, याचा अंदाज घेऊन शेततळ्याचा आकार ठरविण्यात येणार आहे. विदर्भातही फळबाग वाढावी याकरिता शासनाच्यावतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे देण्यात येणार आहे. हे शेततळे १०० टक्के अनुदानावर आहे. फळबाग असलेल्या चार ते पाच शेतकऱ्यांनी अर्ज केला तर कृषी विभागाकडून शेततळे देण्यात येणार आहे. - मुरली इंगळे प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक, वाशिम