शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

फळबागांसाठी सामूहिक शेततळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2015 01:48 IST

फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सामुहिक शेततळे देण्यात येणार

- विवेक चांदूरकर, वाशिम

फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सामुहिक शेततळे देण्यात येणार आहे. याकरिता फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना सामुहिक अर्ज कृषी विभागाकडे करावा लागणार असून, फळबागांच्या क्षेत्रफळानुसार शेततळे मंजूर करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे फळबागा कमी आहेत. पश्चिम महाराष्ट्रात धरणांसह विहिरी, तलाव व शेततळ्यांवर आधारीत सिंचन करण्यात येत असल्याने द्राक्ष, डाळींब, मोसंबीच्या फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत.त्यातुलनेत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरडवाहू आणि खारपाणपट्टा असल्यामुळे सिंचन करण्यात येत नाही. त्यामुळे फळबाग नाहीत. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी काही प्रमाणात असलेल्या संत्रा व केळीच्या फळबागही आता कमी होत आहे. त्यामुळे यामध्ये वाढ करण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध नाविण्यपूर्ण योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये फळबाग असलेल्या शेतकऱ्यांना समुहिक शेततळे देण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी फळबाग असलेल्या चार ते पाच शेतकऱ्यांना एक गट स्थापन करावा लागणार आहे. या शेतकऱ्यांना चार शेतांच्या मध्यभागी शेततळे देण्यात येईल. हे शेततळे १०० टक्के अनुदानावर असून, शेतकऱ्यांना खर्च करावा लागणार नाही. शेततळ्याचा आकार हा फळबागांच्या क्षेत्रफळावर अवलंबून राहणार आहे. पावसाळा व हिवाळ्यात विहिरी किंवा धरणांमध्ये जलसाठा असल्यामुळे सिंचन करता येते. मात्र उन्हाळ्यात साठा संपल्यावर पाणी नसल्याने फळबागा सुकतात. उन्हाळ्यात शेततळ्यातील पाणी फळबागांना दिल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होवू शकतो. त्यादृष्टीनेच शासनाने प्लॅस्टीकची पन्नी असलेले शेततळे १०० टक्के अनुदानावर देण्याची योजना सुरू केली आहे.सामूहिक फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्लॅस्टिकची पन्नी असलेले शेततळे देण्यात येणार आहे. १० लाख ते १ कोटी लिटर पाणी धारण क्षमता असलेले शेततळे या योेजनेंतर्गत देण्यात येईल. शेतकऱ्यांकडे असलेल्या फळबागांना किती पाण्याची गरज आहे, याचा अंदाज घेऊन शेततळ्याचा आकार ठरविण्यात येणार आहे. विदर्भातही फळबाग वाढावी याकरिता शासनाच्यावतीने राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे देण्यात येणार आहे. हे शेततळे १०० टक्के अनुदानावर आहे. फळबाग असलेल्या चार ते पाच शेतकऱ्यांनी अर्ज केला तर कृषी विभागाकडून शेततळे देण्यात येणार आहे. - मुरली इंगळे प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक, वाशिम