शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

‘जलसंपदा’मध्ये वरातीमागून घोडे

By admin | Updated: December 14, 2014 01:13 IST

राज्यातील सर्व सिंचन महामंडळांमध्ये गेली 18 वर्षे मनमानी नियम करून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणो घडल्यानंतर आता राज्य शासनाला जाग आली

यदु जोशी ल्ल नागपूर
राज्यातील सर्व सिंचन महामंडळांमध्ये गेली 18 वर्षे मनमानी नियम करून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणो घडल्यानंतर आता राज्य शासनाला जाग आली असून, जलसंपदा विभागासाठी र्सवकष स्वतंत्र नियमावली तयार करण्यासाठी आता खात्यातील विद्यमान आणि माजी अधिका:यांची एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती सहा महिन्यांच्या आत सरकारला अहवाल देईल.
जलसंपदा विभागाचा कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमावलीनुसार चालतो. 1929 ची ही नियमावली 1984 मध्ये अद्ययावत करण्यात आली होती. 1996 मध्ये सिंचन महामंडळांची निर्मिती करण्यात आली; पण त्यांच्यासाठी वेगळी नियमावलीच तयार करण्यात आली नाही. त्याचा फायदा घेत मनमानी निर्णय घेण्यात आले.
 बांधकाम विभागाची नियमावली सोईनुसार वापरण्यात आली आणि भ्रष्टाचाराला त्यातूनच सुरुवात
झाली. मंत्रलयातील अधिकारी आणि कार्यकारी संचालकांनी 
अनेक अधिकार आपल्या मुठीत 
ठेवले. निविदा प्रक्रिया, 
प्रशासकीय अधिकारांचा अर्थ आपल्या सोईनुसार लावण्यात आल्याचे चित्र होते.
सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या डॉ. माधवराव चितळे समितीने या उणिवेवर नेमके बोट ठेवले 
आणि ‘जलसंपदा’साठी स्वतंत्र नियमावली करण्याची महत्त्वाची शिफारस केली. ती स्वीकारल्यानंतर शासनाने आता समितीचे घोडे पुढे दामटले आहे. 
गैरव्यवहारांचा हत्ती निघून गेला असताना सरकारला नियमावलीचे भान आले असले, तरी राज्यात 
अजून 6क्-7क् हजार कोटी रुपये खर्चाचे सिंचन प्रकल्प उभारायचे आहेत. त्यांच्या उभारणीत घोटाळ्यांना चाप बसण्यासाठी स्वतंत्र नियमावलीचा फायदाच होईल, असे मत जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी व्यक्त केले. 
 
अशी आहे समिती़़़ 
समितीचे अध्यक्ष - एस. एस. सहस्रबुद्धे. सदस्य - एम. आय. शेख, एस. एम.उपासे, रा. वा. पानसे, व्ही. के. कांबळे, व्ही. ए. अंकुश, शीलानाथ जाधव, डी. आर. जोशी, डॉ. पी. के. पवार, प्रवीण कोल्हे, पी. व्ही. मन्नीकर, जी. व्ही. व्यवहारे, मुकुंद पातूरकर, आर. साईनाथ. 
सदस्य सचिव : आर. आर. शहा.