शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
2
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
3
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
4
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
5
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
7
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
8
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
9
सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
10
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा
11
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
12
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?
13
बलुच आर्मीचा पाकिस्तानी आयएसआयवर तगडा वार; महत्वाचा एजंट मुहम्मद हसनीला उडविले...
14
बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 
15
गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, थोडक्यात वाचली अभिनेत्री
16
नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश, सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर २५ लाख रुपयांचे होते बक्षीस
17
तुर्कीचा भ्रमाचा भोपळा फुटला! अभेद्य समजला जाणारा बायरकतार ड्रोन भारताने पाडला अन्...
18
५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय?
19
"लगेच निवडणुका लागणार होत्या म्हणून..."; अपात्र 'लाडक्या बहिणीं'ना दिलेल्या पैशाबाबत अजित'दादां'चं मोठं विधान
20
Whatsapp युजर्सना एसबीआयचा इशारा, याकडे लक्ष दिलं नाही तर होईल मोठं नुकसान

शेतीसाठी निराशाजनक

By admin | Updated: July 10, 2014 23:09 IST

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प शेतीसाठी निराशाजनक असून, शेती व्यवसायाला दिशा देण्याची आणि शेतक:यांच्या प्रगतीचा रोडमॅप तयार करण्याची संधी सरकारने गमावली आह़े

बुधाजीराव मुळीक
 
पुणो : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प शेतीसाठी निराशाजनक असून, शेती व्यवसायाला दिशा देण्याची आणि शेतक:यांच्या प्रगतीचा रोडमॅप तयार करण्याची संधी सरकारने गमावली आह़े 
2क्12 साली राज्यात दुष्काळ होता, 13 साली पूर तर यंदा गारपीठ झाली. त्यातच पावसाने ओढ दिली आहे. अशावेळी राज्यासह देशातील शेतीला केंद्र सरकार दिशा देऊ शकले असते. सिंचनयोजनांसाठी एक हजार कोटींची तरतूद काहीच नाही. त्यासाठी एकटय़ा महाराष्ट्राला 5 हजार कोटींची आवश्यकता असते. शेतक:यांसाठीच्या जुन्याच योजना सुरू ठेवण्यात आल्या आहेत. शेती कर्जासाठी आठ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात 12 लाख कोटींची गरज आहे. शेतक:यांनी हा पैसा सावकाराकडून उभा करायचा का?, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.
माती, पाणी परीक्षणासाठी फक्त 1क्क् कोटींची तरतूद आहे. ती फारच कमी आहे. शेतीवर आधारित उद्योगांसाठी तरतुदी करताना त्यांचे बाजारातील महत्व लक्षात घेण्यात आलेले नाही. कृषी विद्यापीठ आणि त्यासंबंधी नव्या संस्थांची केंद्राने घोषणा केली आहे.  
नदी जोड प्रकल्पाच्या अभ्यासासाठी 1क्क् कोटींची तरतूद आहे, मात्र प्रकल्पाचा कुठेही उल्लेख नाही. जलसंधारणासाठी 2 हजार 142 कोटींची तरतूद स्वागतार्ह आहे. मार्के ट उभारण्यासाठी 5क्क् कोटी रूपयांची तरतूद केली आहे. बाकी सर्व नियोजनाचा भार नाबार्डवर सोपविला आहे. आजच्या अर्थसंकल्पामुळे केंद्र सरकारची पुढील पाच वर्षाची वाटचाल ठरू शकते. मात्र, जिरायतीचा विकास कसा करणार, अन्नसुरक्षेचे काय, उत्पादन खर्चावर शेतीमालाचे दर ठरणार का ?,  धरणातील सर्व गाळ काढणार का, या बाबींची उत्तरे सापडत नाहीत़ 
 
 या गुंतवणुकीमुळे येत्या पाच वर्षात संरक्षण दलात 7क् टक्के स्वदेशी उत्पादने तयार होतील. ‘वन रँक वन पेन्शन’ या योजनेची अनेक वर्षापासून मागणी होती. त्याला या अर्थसंकल्पामध्ये मान्यता मिळाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात आजर्पयत एकही ‘युद्ध स्मारक’ बांधण्यात आलेले नाही. सध्या असलेली सर्व स्मारके ब्रिटिशकाळात बांधलेली आहेत. बजेटमधील स्मारकाची तरतूद प्रेरणा देणारी आहे.
- ब्रिगेडीयर एस. डी. घोरपडे
 
वन रँक वन पेन्शन ही योजना राबविण्यासाठी 1 हजार कोटी रूपये अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत. मात्र ते अपुरे आहेत. गेल्या अर्थसंकल्पात सुध्दा ही घोषणा करण्यात आली होती मात्र काहीच झाले नव्हते.  वॉर मेमोरिअल बनविण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र जे सैनिक हुतात्मा झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि सध्या कार्यरत असलेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोणताही विशेष लाभ देण्यात आलेला नाही.
- एम. के. गुप्ता रॉय, 
निवृत्त कर्नल 
 
अर्थसंकल्पात भव्यदिव्य काहीही दिसत नसले, तरी भाववाढ रोखण्याच्या दृष्टीने पडलेले सरकारचे पहिले पाऊल आहे. सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने सरकारकडून फार काही आशा करणो योग्य ठरणार नाही. वर्षभरात आर्थिक परिस्थिती सुधारली, देशाचे उत्पन्न वाढले, तर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची अपेक्षा पुढील वर्षी करणो योग्य ठरेल. ताकद नसेल तर खर्च करणो योग्य नाही, अंथरुण पाहून पाय पसरणो, हे धोरण सरकारचे असावे. ते योग्य वाटते. 
अरुण फिरोदिया (उद्योगपती) 
 
ग्रामीण भागात गृहबांधणीसाठी 8क्क्क् कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी विशेष तरतूद, शेतीसाठी भरीव तरतूद, दूरदर्शन संच, साबण आणि चप्पल, बूट स्वस्त होणार. पूर्वलक्ष्यी प्रभावाने परिणाम करणा:या तरतुदी केल्या जाणार नाहीत. गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणारी कररचना अशा अनेक तरतुदींमुळे हा अर्थसंकल्प समाजातील दिलासा देणारा आहे. 
-अशोक पगारिया (सदस्य, प्रादेशिक प्रत्यक्ष कर सल्लागार समिती, पुणो) 
 
अर्थसंकल्प हा व्यक्तिगत करदाता, सर्वसामान्य माणूस, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक यांना दिलासा देणारा आहे. कलम 8क् सी खालील सार्वजनिक बचत, विमा व प्रॉव्हिडंड फंड आदीवरील खर्चासाठी वजावटीची रक्कम 2 लाख रुपयांर्पयत वाढविली. ज्येष्ठ नागरिकांसाठी करमुक्त उत्पन्न मर्यादा 3 लाखांवर नेली आहे. या प्रत्यक्ष करातील नवीन प्रस्तावित तरतुदीमुळे सामान्य करदात्याच्या करामध्ये मोठी बचत होणार आहे.  अशोक पगारिया (सदस्य, प्रादेशिक प्रत्यक्ष कर सल्लागार समिती)