शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

हिट अँड रन प्रकण: कमाल खानला समन बजावण्याची सलमानच्या वकिलांची मागणी

By admin | Updated: November 16, 2015 17:25 IST

वांद्रे येथे २००२ साली झालेल्या हिट अँड रन प्रकरणी गायक कमाल खान याला साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका सलमान खानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १६ -  वांद्रे येथे २००२ साली झालेल्या हिट अँड रन अपघाताप्रकरणी गायक कमाल खान याला साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका अभिनेता सलमान खानच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल केली आहे. अपघातावेळी गाडीत उपस्थित असलेला कमाल ' गाडी नक्की कोण  चालवत होतं यावर प्रकाश टाकू शकेल' असे सांगत सलमानच्या वकिलांनी त्याला साक्षीदार म्हमून बोलावण्याची मागणी केली आहे. 
अभिनेता सलमान खानने २००२ साली मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत वांद्रे येथील फूटपाथवरील झोपलेल्या नागरिकांना चिरडले होते, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाले होते. यावेळी गाडीत सलमानसह त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग, अंगरक्षक पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील तसेच कमाल खान उपस्थित होता. अपघातावेळी आपणच गाडी चालवत असल्याचा ड्रायव्हर अशोक सिंगने कबूलीजबाब दिला होता, मात्र काही दिवसांनी त्याने आपला जबाब बदलला होता. तर खटल्याच्या सुनावणीदरम्यानच रवींद्र पाटील याचा मृत्यू झाल्याने अपघाताचा कमाल हा एकमेव साक्षीदार उरला आहे. मात्र अपघातानंतर काही दिवसांनीच कमाल देशाबाहेर पळून गेला व सध्या तो अज्ञातवासात आहे. अपघात कसा घडला, गाडी नक्की कोण चालवतं होतं, या सर्व बाबी स्पष्ट होण्यासाठी कमालची साक्ष अतिशय महत्वाची असून त्या पार्श्वभूमीवरच सलमानच्या वकिलांनी त्याला समन्स बजावण्याची मागणी केली आहे.