शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

सरपंचपदाच्या उमेदवार महिलेचे अपहरण व सुटका

By admin | Updated: August 15, 2015 00:57 IST

तालुक्यातील मासू ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील गाव पॅनेलतर्फे निवडून आलेल्या सरपंचपदाच्या दावेदार महिला उमेदवाराचे चार अज्ञात

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्यातील मासू ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील गाव पॅनेलतर्फे निवडून आलेल्या सरपंचपदाच्या दावेदार महिला उमेदवाराचे चार अज्ञात तरुणांनी अपहरण केले आहे. शेतामध्ये काम करीत असताना त्यांचे अपहरण करण्यात आल्याची फिर्याद तिच्या सासू सुभद्रा महादेव मास्कर (६०) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली होती.अपहरण झालेली महिला उमेदवार बुधवारी सायंकाळी घरी परतली असल्याची माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे. अपहरणकर्त्यांनी तिला सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान तिच्या गावापासून ४ ते ५ कि.मी. अंतरावरील आबलोली नाका येथे सोडले. तेथून ती आपल्या घरी गेली. ती पोलीस स्थानकात आल्यानंतर पुढील माहिती घेतली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.निवडून आलेल्या सात सदस्यांपैकी गाव पॅनेलकडून तीन पुरुष सदस्य व एक महिला सदस्याचा समावेश आहे. शिवसेनेकडून तीनही महिला सदस्या निवडून आल्या आहेत. सरपंचपदासाठी सर्वसाधारण स्त्री आरक्षण असल्याने निवडून आलेली कोणीही महिला सरपंच होऊ शकते. अशा स्थितीत गाव पॅनेलकडे चार सदस्य असल्याने गाव पॅनेलचाच सरपंच होणार हे निश्चित होते. या पार्श्वभूमीवर राजकीय चढाओढीतून हे अपहरण झाले असावे, असे बोलले जात आहे.सुभद्रा भास्कर यांच्यासमवेत शेतात काम करीत असताना २२ ते २५ वयोगटातील चार अनोळखी तरुणांनी येऊन ‘विजय मसुरकर यांनी बोलावले आहे,’ असे सांगून या महिलेला वाहनाने घेऊन गेले. उशिरापर्यंत सून घरी परत न आल्याने रात्री अकरा वाजता गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)