शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या उमेदवार महिलेचे अपहरण व सुटका

By admin | Updated: August 15, 2015 00:57 IST

तालुक्यातील मासू ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील गाव पॅनेलतर्फे निवडून आलेल्या सरपंचपदाच्या दावेदार महिला उमेदवाराचे चार अज्ञात

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्यातील मासू ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील गाव पॅनेलतर्फे निवडून आलेल्या सरपंचपदाच्या दावेदार महिला उमेदवाराचे चार अज्ञात तरुणांनी अपहरण केले आहे. शेतामध्ये काम करीत असताना त्यांचे अपहरण करण्यात आल्याची फिर्याद तिच्या सासू सुभद्रा महादेव मास्कर (६०) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली होती.अपहरण झालेली महिला उमेदवार बुधवारी सायंकाळी घरी परतली असल्याची माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे. अपहरणकर्त्यांनी तिला सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान तिच्या गावापासून ४ ते ५ कि.मी. अंतरावरील आबलोली नाका येथे सोडले. तेथून ती आपल्या घरी गेली. ती पोलीस स्थानकात आल्यानंतर पुढील माहिती घेतली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.निवडून आलेल्या सात सदस्यांपैकी गाव पॅनेलकडून तीन पुरुष सदस्य व एक महिला सदस्याचा समावेश आहे. शिवसेनेकडून तीनही महिला सदस्या निवडून आल्या आहेत. सरपंचपदासाठी सर्वसाधारण स्त्री आरक्षण असल्याने निवडून आलेली कोणीही महिला सरपंच होऊ शकते. अशा स्थितीत गाव पॅनेलकडे चार सदस्य असल्याने गाव पॅनेलचाच सरपंच होणार हे निश्चित होते. या पार्श्वभूमीवर राजकीय चढाओढीतून हे अपहरण झाले असावे, असे बोलले जात आहे.सुभद्रा भास्कर यांच्यासमवेत शेतात काम करीत असताना २२ ते २५ वयोगटातील चार अनोळखी तरुणांनी येऊन ‘विजय मसुरकर यांनी बोलावले आहे,’ असे सांगून या महिलेला वाहनाने घेऊन गेले. उशिरापर्यंत सून घरी परत न आल्याने रात्री अकरा वाजता गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)