राष्टÑीय महामार्ग प्रशासनाची हिरवी झेंडी: १०० कि.मी. प्रतितास वेगाची परवानगी !
वसीम कुरैशी - नागपूर
महामार्गांच्या चौपदरीकरणाच्या कार्याला गती देण्यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) हिरवी झेंडी दिली आहे. शासनाच्या निर्देशानुसार राज्याच्या सीमेमधील महामार्गावर वाहनांना ८० कि.मी. प्रतितासाची अट आहे, विकास कार्य पूर्ण झाल्यानंतर एनएचएआय यात बदल करून १०० कि.मी. प्रतितास करणार आहे. यामुळे महामार्गावर आता पूर्वीपेक्षा अधिक गतीने वाहने धावताना दिसून येतील. प्राधिकरणाच्या अधिकार्यांनुसार नवीन निर्देश आल्यास नागपूर ते हैदराबाद ६ तास, नागपूर ते रायपूर ४ तास तर नागपूर ते अमरावती सुमारे २.३० तासाचा वेळ लागेल. वेग वाढल्याने मालवाहतुकीला व प्रवासी परिवहनमध्येही गती येईल. नागपूर-भंडारा मार्गावरील चौपदरी रस्त्याचे कार्य नुकतेच पूर्ण झाले. नागपूर-ओबेदुल्लागंज एनएच ६९चे कार्य अद्यापही सुरू आहे. याला पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. एनएचएआयचे अधिकारी वेगाला घेऊन मोठमोठे दावे करीत असले तरी अनेक रस्त्याच्या दुर्दशेला घेऊन काही बोलण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे नागपूर-हैदराबाद मार्गावर सुमारे ४६ कि.मी.पर्यंतचा रस्ता खराब आहे. नागपूर-उमरेड रस्त्याचीही हालत खस्ता आहे. शहरातील महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी एनएचएआयकडून मनपाकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. याला घेऊन मनपा आयुक्तांनी एनएचएआय अधिकार्यांशी रविवारी बैठक घेतली.