शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

राज्यात आज महास्वच्छता अभियान

By admin | Updated: December 13, 2015 01:09 IST

रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर रविवारी सकाळी सात वाजेपासून महत्त्वाकांक्षी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

अलिबाग : रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर रविवारी सकाळी सात वाजेपासून महत्त्वाकांक्षी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चे स्वच्छतादूत तथा डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वच्छता मोहिमेला उपस्थित राहणार आहेत. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक वर्षांपासून व्यापक स्वरूपात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात शहरांमध्ये व दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागांमध्ये अभियान राबविले जाईल. रविवारी १०० पेक्षा जास्त शहरातील रस्ते, पोलीस ठाणे, सरकारी कार्यालये, सरकारी मुख्यालय, बस स्थानके, रुग्णालये, समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात करण्यात येणार आहेत. तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा समावेश असलेली मानवी साखळी हे स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पाडणार आहे. (प्रतिनिधी)स्वयंशिस्त, स्वच्छतेचा अंगीकार राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून स्वच्छतेबाबत स्वयंशिस्तीचा अंगीकार केल्यास भारत जगातील सर्वात स्वच्छ आणि स्वच्छतेसाठी जागरूक देश म्हणून ओळखला जाईल, असा ठाम विश्वास डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे.व्यापक मोहीममहाराष्ट्रातील १४ महापालिका, २३ नगरपालिका (गुजरात-३, गोवा-१), ३४ नगरपरिषदा, ९ नगरपंचायती तसेच रायगड (१२), ठाणे (५), पालघर (२), नाशिक (२), जळगाव (१), पुणे (१), रत्नागिरी (१) जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये अभियान राबविले जाईल.