शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

अशोक चव्हाणांचे नाव वगळण्यास हायकोर्टाचा नकार

By admin | Updated: November 20, 2014 08:50 IST

आरोपपत्रात आरोपी म्हणून समाविष्ट असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.

मुंबई : आदर्श सहकारी गृहनिर्माण सोसायटीने मुंबईत कुलाबा येथे बांधलेल्या वादग्रस्त इमारतीशी संबंधित घोटाळ्यात याआधीच दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपी म्हणून समाविष्ट असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्यासाठी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय)ने केलेला अर्ज न्या. एम. एल. टहलियानी यांनी २६ पानी सविस्तर निकाल देऊन फेटाळला. न्या. टहलियानी सध्या नागपूर येथे असल्याने त्यांनी तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाल जाहीर केला.हा निकाल तहकूब ठेवण्याची विनंती सीबीआयने केली. याआधी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे अशोक चव्हाण यांच्यावरील खटल्याचे कामकाज गेले सहा महिने स्थगित राहिले होते. हे लक्षात घेऊन न्या. टहलियानी यांनी बुधवारी दिलेला निकाल चार आठवड्यांसाठी तहकूब ठेवला. ४ जुलै २०१२ रोजी सीबीआयने इतर १२ आरोपींसह अशोक चव्हाण यांच्यावरही आरोपपत्र दाखल केले होते. त्यात चव्हाण यांच्यावर भारतीय दंड विधानाचे कलम १२० बी (गुन्हेगारी स्वरूपाचा कट) आणि ४२० (फसवणूक) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२) व १३(१)(डी) या गुन्ह्यांचे आरोप होते. परंतु तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी चव्हाण यांच्याविरुद्ध भादंवि कलम १२० बी व ४२० अन्वये खटला भरण्यास गेल्या वर्र्षी १७ डिसेंबर रोजी संमती नाकारली होती. परिणामी दंड विधानाखालील गुन्हे वगळून केवळ भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखालील गुन्ह्यांसाठी खटला चालविण्यात काहीच हासिल नसल्याने आरोपपत्रातून अशोक चव्हाण यांचे नाव आरोपी म्हणून पूर्णपणे वगळून टाकावे, असा अर्ज केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) विशेष न्यायालयात केला होता. गेल्या १८ जानेवारीस विशेष न्यायालयाने तो फेटाळला होता. याविरुद्ध सीबीआयने पुनरीक्षण अर्ज केला होता.

येत्या महिनाभरात सीबीआय किंवा अशोक चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन उच्च न्यायालयाच्या निकालास स्थगिती मिळविली नाही, तर चव्हाण यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये खटल्यास सामोरे जावे लागेल. अर्थात हा खटलाही लगेच सुरू होईल, असे नाही. कारण मुळात या प्रकरणाचा तपास करण्याच्या सीबीआयच्या अधिकारास अशोक चव्हाण यांनी आव्हान दिले असून, त्याचा फैसला उच्च न्यायालयात होत नाही तोपर्यंत विशेष न्यायालयापुढील खटल्यात फारशी प्रगती होणे अपेक्षित नाही.

(विशेष प्रतिनिधी)