शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

उच्च न्यायालयाने सरकारला घेतले फैलावर

By admin | Updated: October 18, 2016 05:12 IST

ध्वनीमापक यंत्रे खरेदी करण्याचा आदेश देऊन व त्यानंतर त्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देऊनही राज्य सरकार यंत्रे खरेदी न करण्यासाठी नवे बहाणे शोधत आहे.

मुंबई: ध्वनीप्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी राज्य सरकारला ध्वनीमापक यंत्रे खरेदी करण्याचा आदेश देऊन व त्यानंतर त्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देऊनही राज्य सरकार यंत्रे खरेदी न करण्यासाठी नवे बहाणे शोधत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारला पुन्हा एकदा फैलावर घेतले. राज्य सरकार अंसेवदनशील आणि असहाय्य असल्याची टीका उच्च न्यायालयाने केली. वारंवार दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने उच्च न्यायालयाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांना उपस्थित राहण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत दिला होता. त्यानुसार सोमवारच्या सुनावणीत बक्षी उपस्थित होते. न्यायालयाचा आदेश असतानाही ध्वनीमापक यंत्रे घेण्यास विलंब का केला जात आहे? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सरकारला केला. त्यावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी कंपनीच्या अंगावर जबाबदारी ढकलली. कंपनीच वेळेत यंत्रे तयार करून देत नसल्याने यापूर्वी दिलेली आॅर्डरही रद्द करण्यात आल्याची माहिती न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाला दिली.‘मुदतवाढी संपल्यानंतर सरकारने यंत्रे खरेदीची आॅर्डर दिली. याचाच अर्थ सरकार जाणुनबुजून न्यायालयाचे आदेश पाळत नाही. सरकारची ही वृत्ती अयोग्य आहे. सरकारला वेळ मिळावा म्हणून आम्ही मुदतवाढ देत आहोत. मात्र तुम्ही आमचा मौल्यवान वेळ घालवत आहात सरकार असंवेदनशील, असहाय्य आहे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २० आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)