शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

उच्च न्यायालयाने सरकारला घेतले फैलावर

By admin | Updated: October 18, 2016 05:12 IST

ध्वनीमापक यंत्रे खरेदी करण्याचा आदेश देऊन व त्यानंतर त्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देऊनही राज्य सरकार यंत्रे खरेदी न करण्यासाठी नवे बहाणे शोधत आहे.

मुंबई: ध्वनीप्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी राज्य सरकारला ध्वनीमापक यंत्रे खरेदी करण्याचा आदेश देऊन व त्यानंतर त्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देऊनही राज्य सरकार यंत्रे खरेदी न करण्यासाठी नवे बहाणे शोधत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारला पुन्हा एकदा फैलावर घेतले. राज्य सरकार अंसेवदनशील आणि असहाय्य असल्याची टीका उच्च न्यायालयाने केली. वारंवार दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने उच्च न्यायालयाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांना उपस्थित राहण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत दिला होता. त्यानुसार सोमवारच्या सुनावणीत बक्षी उपस्थित होते. न्यायालयाचा आदेश असतानाही ध्वनीमापक यंत्रे घेण्यास विलंब का केला जात आहे? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सरकारला केला. त्यावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी कंपनीच्या अंगावर जबाबदारी ढकलली. कंपनीच वेळेत यंत्रे तयार करून देत नसल्याने यापूर्वी दिलेली आॅर्डरही रद्द करण्यात आल्याची माहिती न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाला दिली.‘मुदतवाढी संपल्यानंतर सरकारने यंत्रे खरेदीची आॅर्डर दिली. याचाच अर्थ सरकार जाणुनबुजून न्यायालयाचे आदेश पाळत नाही. सरकारची ही वृत्ती अयोग्य आहे. सरकारला वेळ मिळावा म्हणून आम्ही मुदतवाढ देत आहोत. मात्र तुम्ही आमचा मौल्यवान वेळ घालवत आहात सरकार असंवेदनशील, असहाय्य आहे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २० आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)