शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या कूर्मगतीने हायकोर्ट असमाधानी

By admin | Updated: September 21, 2016 05:13 IST

गेल्या नऊ महिन्यांत राज्यभरातील एक चतुर्थांश बेकायदा धार्मिकस्थळांवरही राज्य सरकार व महापालिकांनी कारवाई केली नाही

मुंबई : गेल्या नऊ महिन्यांत राज्यभरातील एक चतुर्थांश बेकायदा धार्मिकस्थळांवरही राज्य सरकार व महापालिकांनी कारवाई केली नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व महापालिकेच्या कामाबाबत असमाधान व्यक्त केले. राज्य सरकार याबाबत पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा शेराही या वेळी उच्च न्यायालयाने मारला.संपूर्ण देशातील बेकायदेशीर धार्मिकस्थळांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २००९ रोजी दिले होते. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत अधिसूचना काढली. परंतु, त्याची अंमलबजावणी केलीच नाही. त्यामुळे जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात धाव घेतली. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी जनहित मंचने याचिकेद्वारे केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकारला अनेकदा फटकारल्यानंतर अखेरीस सरकारने १८ नोव्हेंबर २०१५ रोजी नव्याने अधिसूचना काढत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यासाठी नऊ महिन्यांची मुदत महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिली. ही मुदत १७ आॅगस्ट २०१६ रोजी संपल्याने राज्य सरकारने कारवाईची मुदत वाढवून देण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या ६६ हजार ८९ बेकायदेशीर धार्मिकस्थळांपैकी आतापर्यंत केवळ एक हजार ३१ बेकायदेशीर धार्मिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याचे सरकारच्या अहवालत म्हटले आहे. यामध्ये सप्टेंबर २००९ पूर्वीच्या व नंतरच्या बांधकामांचाही समावेश आहे. तर महापालिकेने २००९ नंतर महापालिकेच्या हद्दीत केवळ चारच अनधिकृत धार्मिकस्थळे बांधण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. गेल्या आठ वर्षांत केवळ चारच बेकायदेशीर धार्मिकस्थळे मुंबईत बांधण्यात आली? नक्की मुंबई महापालिकेचीच आकडेवारी सांगत आहात ना? तुमचे अधिकारी गंभीर आहेत ना? अशा प्रश्नांची सरबत्ती करत उच्च न्यायालयाने ही आकडेवारी खरी आहे की नाही, हे पाहण्यासाठी समिती नेमू, असा इशाराही महापालिकेला दिला. (प्रतिनिधी)6 बांधकामे खासगी जागांवर असल्याने महापालिकेने त्यांना नोटीस बजावली17अनधिकृत धार्मिक स्थळे १ मे १९६० पूर्वीची असल्याने राज्य स्तरीय समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली