शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

कारवाईच्या कूर्मगतीने हायकोर्ट असमाधानी

By admin | Updated: September 21, 2016 05:13 IST

गेल्या नऊ महिन्यांत राज्यभरातील एक चतुर्थांश बेकायदा धार्मिकस्थळांवरही राज्य सरकार व महापालिकांनी कारवाई केली नाही

मुंबई : गेल्या नऊ महिन्यांत राज्यभरातील एक चतुर्थांश बेकायदा धार्मिकस्थळांवरही राज्य सरकार व महापालिकांनी कारवाई केली नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व महापालिकेच्या कामाबाबत असमाधान व्यक्त केले. राज्य सरकार याबाबत पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा शेराही या वेळी उच्च न्यायालयाने मारला.संपूर्ण देशातील बेकायदेशीर धार्मिकस्थळांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २००९ रोजी दिले होते. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत अधिसूचना काढली. परंतु, त्याची अंमलबजावणी केलीच नाही. त्यामुळे जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात धाव घेतली. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी जनहित मंचने याचिकेद्वारे केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकारला अनेकदा फटकारल्यानंतर अखेरीस सरकारने १८ नोव्हेंबर २०१५ रोजी नव्याने अधिसूचना काढत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यासाठी नऊ महिन्यांची मुदत महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिली. ही मुदत १७ आॅगस्ट २०१६ रोजी संपल्याने राज्य सरकारने कारवाईची मुदत वाढवून देण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या ६६ हजार ८९ बेकायदेशीर धार्मिकस्थळांपैकी आतापर्यंत केवळ एक हजार ३१ बेकायदेशीर धार्मिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याचे सरकारच्या अहवालत म्हटले आहे. यामध्ये सप्टेंबर २००९ पूर्वीच्या व नंतरच्या बांधकामांचाही समावेश आहे. तर महापालिकेने २००९ नंतर महापालिकेच्या हद्दीत केवळ चारच अनधिकृत धार्मिकस्थळे बांधण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. गेल्या आठ वर्षांत केवळ चारच बेकायदेशीर धार्मिकस्थळे मुंबईत बांधण्यात आली? नक्की मुंबई महापालिकेचीच आकडेवारी सांगत आहात ना? तुमचे अधिकारी गंभीर आहेत ना? अशा प्रश्नांची सरबत्ती करत उच्च न्यायालयाने ही आकडेवारी खरी आहे की नाही, हे पाहण्यासाठी समिती नेमू, असा इशाराही महापालिकेला दिला. (प्रतिनिधी)6 बांधकामे खासगी जागांवर असल्याने महापालिकेने त्यांना नोटीस बजावली17अनधिकृत धार्मिक स्थळे १ मे १९६० पूर्वीची असल्याने राज्य स्तरीय समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली