शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या कूर्मगतीने हायकोर्ट असमाधानी

By admin | Updated: September 21, 2016 05:13 IST

गेल्या नऊ महिन्यांत राज्यभरातील एक चतुर्थांश बेकायदा धार्मिकस्थळांवरही राज्य सरकार व महापालिकांनी कारवाई केली नाही

मुंबई : गेल्या नऊ महिन्यांत राज्यभरातील एक चतुर्थांश बेकायदा धार्मिकस्थळांवरही राज्य सरकार व महापालिकांनी कारवाई केली नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकार व महापालिकेच्या कामाबाबत असमाधान व्यक्त केले. राज्य सरकार याबाबत पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा शेराही या वेळी उच्च न्यायालयाने मारला.संपूर्ण देशातील बेकायदेशीर धार्मिकस्थळांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २००९ रोजी दिले होते. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत अधिसूचना काढली. परंतु, त्याची अंमलबजावणी केलीच नाही. त्यामुळे जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात धाव घेतली. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी जनहित मंचने याचिकेद्वारे केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकारला अनेकदा फटकारल्यानंतर अखेरीस सरकारने १८ नोव्हेंबर २०१५ रोजी नव्याने अधिसूचना काढत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यासाठी नऊ महिन्यांची मुदत महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिली. ही मुदत १७ आॅगस्ट २०१६ रोजी संपल्याने राज्य सरकारने कारवाईची मुदत वाढवून देण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या ६६ हजार ८९ बेकायदेशीर धार्मिकस्थळांपैकी आतापर्यंत केवळ एक हजार ३१ बेकायदेशीर धार्मिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याचे सरकारच्या अहवालत म्हटले आहे. यामध्ये सप्टेंबर २००९ पूर्वीच्या व नंतरच्या बांधकामांचाही समावेश आहे. तर महापालिकेने २००९ नंतर महापालिकेच्या हद्दीत केवळ चारच अनधिकृत धार्मिकस्थळे बांधण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. गेल्या आठ वर्षांत केवळ चारच बेकायदेशीर धार्मिकस्थळे मुंबईत बांधण्यात आली? नक्की मुंबई महापालिकेचीच आकडेवारी सांगत आहात ना? तुमचे अधिकारी गंभीर आहेत ना? अशा प्रश्नांची सरबत्ती करत उच्च न्यायालयाने ही आकडेवारी खरी आहे की नाही, हे पाहण्यासाठी समिती नेमू, असा इशाराही महापालिकेला दिला. (प्रतिनिधी)6 बांधकामे खासगी जागांवर असल्याने महापालिकेने त्यांना नोटीस बजावली17अनधिकृत धार्मिक स्थळे १ मे १९६० पूर्वीची असल्याने राज्य स्तरीय समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली