शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उच्चांकी ४०.९ :नाशिककरांना उन्हाचा तडाखा

By admin | Updated: April 13, 2017 22:04 IST

मागील पाच वर्षांमध्ये प्रथमच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा नाशिककरांना सोसाव्या लागत आहे.

नाशिक : शहरात मागील दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा कायम असून, उष्ण वातावरणामुळे नागरिकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. गुरुवारी (दि.१३) शहरात हंगामातील उच्चांकी ४०.९ इतक्या तपमानाची नोंद करण्यात आली. मागील पाच वर्षांमध्ये प्रथमच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या तीव्र झळा नाशिककरांना सोसाव्या लागत आहे.मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीन दिवस सुमारे ४०.३ अंशांवर शहराचे तपमान होते. त्यानंतर प्रथमच बुधवारी ४०.७ अंशांवर पारा सरकला आणि गुरुवारी दोन अंशांनी वाढ होऊन पारा ४१ अंशांच्या आसपास पोहचला आहे. एकूणच दररोज वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नाशिक उष्ण बनले आहे.वाढत्या उन्हाची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहिल्यास पुन्हा उष्णतेची लाट आल्याची घोषणा सरकारी पातळीवरून होण्याची शक्यता आहे. यावर्षी प्रथमच ४०.९ इतक्या कमाल तपमानाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १९ एप्रिल रोजी ४१ हा उच्चांक नोंदविला गेला होता. अद्याप चालू महिन्याचे तीन आठवडे शिल्लक असल्याने गेल्या वर्षाच्या कमाल तपमानाचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

गेल्या वर्षीचा विक्रम मोडणारमागील वर्षी १९ एप्रिलरोजी ४१ अंश आणि मे महिन्यामध्येही ४१ अंश इतका उच्चांक राहिला आहे. यावर्षी मात्र एप्रिलच्या १२व्या दिवशीच तपमानाचा पारा थेट ४०.७ अंशाला पोहोचल्याने यावर्षीचा उन्हाळा नाशिककरांसाठी प्रचंड तापदायक ठरणारा आहे. यामुळे नागरिकांनी लहान मुले, वृध्दांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बुधवारी तपमानाचा पारा ४०.७अंशावर स्थिरावला; मात्र यापेक्षा पारा कमी न झाल्यास किंवा मार्च महिन्याप्रमाणे पारा सलग चाळीशीच्या पुढे राहिल्यास उष्णतेचा कहर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरीरात पाण्याची मात्रा टिकवून ठेवणारी फळे खाण्यावर भर द्यावा. बर्फ व बर्फाचा वापर केले जाणारे शितपेय टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

 

वृक्षतोडीमुळे तपमानाचा पारा चढतागेल्या वर्षापासून आतापर्यंत शहराबाहेरील रिंगरोड विकसीत करण्यासाठी बहुतांश वृक्षांवर कु ऱ्हाड चालविली गेली. मार्च महिन्यातच संपुर्ण गंगापूररोड व शहरातील अन्य भागांमधील वर्षानुवर्षे जुने डेरेदार वृक्ष महापालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले. एकूण तोडले गेलेले वृक्ष आणि जगविलेले वृक्ष यांच्या आकडेवारीमध्ये कमालीची तफावत असल्याने जमीनीची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन तपमान मार्चमध्येच चाळीशीपार सरकले आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. वैश्विक तपमानवाढीचा धोका टाळण्यासाठी वृक्षसंवर्धन हा एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

 

तपमानाच्या उच्चांकाचा आढावावर्ष -           कमाल तपमान२००८ =     २४ एप्रिल -४१.४२००९ =      १९ एप्रिल- ४१.४ २०१० =       १६ एप्रिल -४२.०२०११ =        २७ एप्रिल - ४०.४२०१२ =        ८ एप्रिल - ४०.० २०१३ =         १ मे - ४०.६ २०१४ =         ७ मे -४०२०१५ =         २० एप्रिल ४०.६२००१६ = १९ एप्रिल /१८ मे - ४१.०