शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

महावितरणची छुपी दरवाढ

By admin | Updated: July 1, 2015 01:25 IST

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) १ जूनपासून एकूण सरासरी २.४४ टक्क्यांनी कमी केले

मुंबई : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) १ जूनपासून एकूण सरासरी २.४४ टक्क्यांनी कमी केले असले तरी ही दरकपात फसवी असून बहुसंख्य ग्राहकांच्या हाती येणारे ताजे बिल पूर्वीपेक्षा कमी नव्हे तर जास्त येण्याचे संकेत आहेत.महावितरणने फेब्रुवारी २०१५ च्या तुलनेत वीजदरात ७.९५ टक्के वाढ करण्याची मागणी केली होती. त्याऐवजी आयोगाने ५.७५टक्क्यांची दरकापत मंजूर केली. मात्र एप्रिल २०१५ च्या तुलनेत ही दरकपात २.४४ टक्के असेल, असे आयोगातर्फे सांगण्यात आले होते. त्यावरून महावितरणच्या ग्राहकांना मामुली का होईना पण दिलासा मिळाला, असा समज निर्माण झाला होता. मात्र आयोगाने दिलेल्या आदेशाचा बारकाईने अभ्यास केला असता वीजदर कमी झाले असले तरी सर्वसामान्य ग्राहकांचे वीजबिल कमी होणार नाही. वस्तुत: ग्राहकास येणारे नवे बिल आधीपेक्षा जास्त असेल.असे होण्याचे कारण काय? तर आयोगाने ज्या एप्रिलमधील दरांशी तुलना केली आहे ते निव्वळ वीजदर नाहीत. तर त्यात इंधन अधिभाराचाही (फ्युएल अ‍ॅडजेस्टमेंट चार्जेस -एफएसी)अंतर्भाव आहे. तसेच आता आयोगाने जे दर ठरवून दिले आहेत ते निव्वळ वीजदर आहेत व त्यात ‘एफएसी’ नाही. एवढेच नव्हे तर आता ठरविलेल्या दरांखेरीज महावितरण ‘एफसीए’ची स्वतंत्र आकारणी करू शकते, असे आयोगानेच त्यांच्या आदेशात म्हटले आहे.महावितरणच्या एप्रिलच्या वीजदरात १५ ते २० टक्के हिस्सा ‘एफएसी’चा होता. त्यामुळे आता ठरवून दिलेले नवे दर या तुलनेत कमी दिसत असले तरी त्यावर किमान १५ ते २० टक्के ‘एफसीए’ लाूग होईल. यातून मूळ दरात झालेली कपात वजा केली तरी प्रत्यक्षात ग्राहकाचे वीजबिल वाढलेले असेल. आयोगाने आता ग्राहकांच्या विविध वर्गांंसाठी ठरवून दिलेले नवे दर पाहिले तर उद्योग, रेल्वे व सार्वजनिक सेवावर्ग वगळता अन्य वर्गांतील सामान्य ग्राहकांचे बिल किमान १० ते कमाल २५ टक्क्यांनीही वाढू शकेल, असे दिसते. (विशेष प्रतिनिधी)नवा धक्काही बसू शकतोयेत्या काही महिन्यांत ग्राहकांना आणखीही धक्का बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचे कारण असे की, इंधन अधिभार वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरानुसार वेळोवेळी ठरविला जातो. आता नवे वीजदर ठरले असले तरी महावितरण इंधन अधिभार वाढवून घेण्यासाठी स्वतंत्रपणे आयोगाकडे मागणी करू शकते. अर्थात इंधन अधिभाीर वाढवून दिला तर तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करायचा की पश्चातलक्षी प्रभावाने हे आयोग ठरवितो. त्यानुसार नवा संभाव्य धक्का किती व केव्हापासून बसेल हे लवकरच स्पष्ट होईल.महावितरणच्या एप्रिलच्या वीजदरात १५ ते २० टक्के हिस्सा ‘एफएसी’चा होता. त्यामुळे आता ठरवून दिलेले नवे दर या तुलनेत कमीदिसत आहे.तरी त्यावर किमान १५ ते २० टक्के ‘एफसीए’ लाूग होईल. यातून मूळ दरात झालेली कपात वजा केली तरी प्रत्यक्षात ग्राहकाचे वीजबिल वाढलेले असेल.