शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

इथे उपवराकडून घेतला जातो हुंडा..!

By admin | Updated: December 6, 2015 02:21 IST

हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेचे आपल्या देशात पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. मुलगी सुंदर, शालीन, उच्चशिक्षित असली तरी लग्नाच्या वेळी हुंड्यासाठी किती रुपये मोजावे लागतील, याचा

- जयदेव वानखडे,  जळगाव जामोद (बुलडाणा)

हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेचे आपल्या देशात पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. मुलगी सुंदर, शालीन, उच्चशिक्षित असली तरी लग्नाच्या वेळी हुंड्यासाठी किती रुपये मोजावे लागतील, याचा नेम नसतो. बहुतांश मुलींच्या आई-वडिलांना ही चिंता सतावत असते. मात्र आदिवासी समाजात चित्र अगदी उलट आहे. या समाजात मात्र मुलींना महत्त्व दिले जाते. त्यामुळे मुलीऐवजी मुलाच्या आई-वडिलांना हुंड्याची सोय करावी लागते. या आदिवासी कुटुुंबांमध्येही मुला-मुलींच्या पसंतीला महत्त्व असते; मात्र या पसंतीनंतरही पंचायतने ठरवलेली रक्कम उपवर मुलाकडून मुलीच्या वडिलांना द्यावीच लागते. ही रक्कम साधारणत: १५ हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत असते. सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या या आदिवासींची परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात उपवर युवक आहेत, त्यांना हुंड्याविषयी कमालीची चिंता असते. उपवर मुलगे-मुलींचे पसंतीच्या जोडीदारासोबत पळून जाण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडतात. ही गोष्ट लपून राहत नाही. कुणाची मुलगी आणि कुणाचा मुलगा पळून गेले, हे काही दिवसांतच कळते. एकदा ही माहिती मिळाली की, दोन्ही कुटुंबांकडे मोजके नातेवाईक आणि गावातील प्रमुख पंच यांची बैठक भरते. मुलीच्या वडिलांना किती रक्कम द्यावी, हे या वेळी मुलाच्या वडिलांना सांगितले जाते. ठरलेल्या रकमेचा काही वाटा त्याच वेळी मिळतो, तर उर्वरित रकमेसाठी ठरावीक मुदत दिली जाते. ही रक्कम एक लाखापेक्षा जास्त असल्यास मुलाच्या आई-वडिलांना साल, महिन्याने मजुरी करून रकमेची फेड ठरावीक मुदतीत करावी लागते. वेळप्रसंगी उपवर मुलगासुद्धा त्यांच्याकडे वर्षभर मजुरी करून ठरलेल्या रकमेची फेड करतो. दुसरे लग्न असल्यास खर्च जास्त एखाद्या तरुणाचे दुसऱ्यांदा लग्न असेल, तर त्याला इतरांपेक्षा जास्त रक्कम मुलीच्या वडिलांना द्यावी लागते. ही रक्कम कधीकधी २ लाखांपर्यंतही असते. जळगाव जामोद तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या हनवतखेड, इस्लामपूर, रायपूर, गारपेठ, उमापूर, हेलापाणी, भालांजन, चारबन, निमखेडी, भिंगारा, गोमाल, चाळीसटापरी, कडुपट्टा, मेंढामारी, गोरक्षनाथ, सोनबडी, बांडा पिंपळ, ईसई, शिवणी आदी गावांमध्ये कोरकू, भिल्ल, निहाल, बारेला, भिलाला, धानके या आदिवासी जमातींचे लोक राहतात. या जमातींमध्ये लग्नाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत; मात्र हुंडा सर्वच जमातींमध्ये आढळून येतो. आदिवासींमध्ये अनेक जण या प्रथेविरुद्ध बोलताना दिसतात; मात्र सहसा कुणी उघड-उघड विरोध करण्याची हिंमत दाखवत नाही. आम्ही यासाठी प्रयत्न केले, पण कुणी साथ देत नाही. आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांना शिक्षण देणे हाच यावरील उपाय आहे. - केशरसिंह राऊत, जळगाव जामोद