शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

परीक्षेचे दडपण दूर करण्यासाठी हेल्पलाइन

By admin | Updated: February 27, 2017 05:18 IST

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली

प्राची सोनवणे,नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांच्या मदतीला यंदाही बोर्डाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनचा वापर करून परीक्षेच्या सेंटरची खात्री, मनातील परीक्षेविषयीची भीती, तणाव, वेळापत्रक यावर विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही मार्गदर्शन केले जाणार आहे. ही हेल्पलाइन २७ फेब्रुवारीपासून ते १ मार्च या कालावधीत सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.बारावी बोर्डाची परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार असून, एक दिवसावर येऊन ठेपलेल्या या परीक्षेच्या वेळी निराशा, तसेच अभ्यासाबाबत तक्रारींविषयीच्या समस्या विद्यार्थ्यांनी या हेल्पलाइनवर मांडता येणार आहेत. गेल्यावर्षी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास लक्षात राहत नाही, घाबरगुंडी उडाली आहे, पोटात गोळा आला, परीक्षेत कमी गुण मिळाले तर, अशा चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांनी समुपदेशकही हैराण झाले होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही तितकेच त्रस्त आहेत, असे असून पाल्याच्या अभ्यासाविषयी तक्रारी, परीक्षेच्या वेळापत्रकाविषयी खात्री करण्यासाठी पालकांनीही या हेल्पलाइनचा आधार घेतला आणि घेत असल्याची माहितीही शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली. मुंबई विभागातील समुपदेशक श्रीकांत शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी परीक्षेला जाण्याअगोदर परीक्षार्थी या हेल्पलाइनचा आधार घेत परीक्षा केंद्राची खात्री करून घेतात. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान व्हावे, यासाठी समुपदेशकांकडून पुरेपूर खात्री करून घेतली जाते, असेही शिनगारे यांनी स्पष्ट केले.>१२ समुपदेशकांची नियुक्तीमुंबई विभागातून १२ समुपदेशकांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली आहे. शनिवारपासूनच समुपदेशकांचा फोन खणाणू लागला असून, दोन दिवसांत ५० विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्याची माहिती समुपदेशक श्रीकांत शिनगारे यांनी दिली. बोर्डाची हेल्पलाइन सोमवारी २७ फेब्रुवारीपासून सुरू होत असून आसन व्यवस्था, परीक्षा केंद्र आदींची माहिती या हेल्पलाइनवर मिळेल. मात्र, बैठक व्यवस्था, हॉल तिकीट, केंद्राविषयीची माहिती समुपदेशकांना विचारू नये, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशकांची निवड केल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली.>मुंबई विभागीय मंडळाचा हेल्पलाइन क्रमांक : २७८९३७५६/२७८८१०७५>समुपदेशनाकरिता खालील क्रमांकावर संपर्क साधावाश्रीकांत शिनगारे - ९८६९६३४७६५अशोक सरोदे - ८८८८८३०१३९चंद्रकांत मुंढे - ९८६९३०७६५७अनिलकुमार गाढे - ९९६९०३८०२०स्मिता शिपुरकर - ९८१९०१६२७०