शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

By admin | Updated: July 30, 2015 02:09 IST

पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकसह केरळवर पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यात ठिकाठिकाणी पावसाच्या धारा कोसळतच असून, या कमी

मुंबई : पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकसह केरळवर पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यात ठिकाठिकाणी पावसाच्या धारा कोसळतच असून, या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढत असल्याने पुढील ७२ तासांसाठी राज्यासह मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैऋत्य राजस्थान आणि गुजरात लगतच्या भागावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची कायम आहे. ईशान्य बंगालचा उपसागर, बांग्लादेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र स्थिर असून, त्याची तीव्रता कायम आहे. समुद्र सपाटीवर कर्नाटक किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कमी झाला आहे. मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.३० जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. ३१ जुलै आणि १ आॅगस्ट रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. २ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पडेल. पुढील ४८ तासांत मुंबईत पावसाच्या मुसळधार सरी पडण्याची शक्यता असून, कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३०, २४ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. जलसंकट टळणार : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने जलाशय निम्मे भरले आहेत. परिणामी मुंबईत १ आॅगस्टपासून लागू होणारी १५ टक्के पाणीकपात टळण्याची चिन्हे आहेत. आता या जलाशयांमध्ये पुढील १८० दिवस पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे.