शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

व-हाडात दमदार पाऊस; अकोला, वाशिममध्ये वादळीवा-याने हाहाकार!

By admin | Updated: September 17, 2015 23:59 IST

अकोला जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका, वाशिममधील ढोरखेडा गावात अनेक घरांची पडझड, बुलडाण्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू.

अकोला: वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी संततधार पाऊस बरसला. वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त होता. या जिल्ह्यातील ढोरखेडा गावातील जवळपास ४0 घरांची पडझड झाली असून, बुलडाणा जिल्ह्यात एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. अकोल्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील एका गावात चक्रीवादळाने अक्षरश: तांडव केले. या गावातील सागवानाची अख्खी झाडं वादळीवार्‍यात उडताना लोकांनी पाहीली.

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असला तरी, मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथे वादळीवारा आणि मुसळधार पावसाने ३0 ते ४0 घरांची पडझड झाली असून १३ जण जखमी झाले. सुसाट्याच्या वार्‍याने घरांवरील टिनपत्रे उडून गेले. भिंतींची पडझड झाली. काही झाडे घरांवर उन्मळून पडल्याने घरांची पडझड झाली. गावातील जवळपास ३0 ते ४0 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घराच्या पडझडीत १३ जण जखमी असून, एक महिला गंभीर जखमी झाल्याने तिला अकोला येथे हलविण्यात आले. पंधरा दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा होता. त्यामुळे खरीप पिकांवर ताण आल्याने, सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा होती. अकोल्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ आणि पावसाचे वातावरण होते.

 सकाळी ११ वाजतापासून अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यात पाऊस सुरू झाला. या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात २१.0४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. बाश्रीटाकळी तालुक्यातील मुंगसाजीनगर या आदिवासीबहुल परिसराला चक्रीवादळाचा फटका बसला. जंगलातील शेकडो सागवान झाडे मुळासकट उखडून हवेत उडताना गावकर्‍यांनी पाहिले. ही विनाशकारी दृश्ये अनेकांनी ह्ययाची डोळाह्ण पाहिली. निसर्गाचे हे तांडव सुरू असताना ग्रामस्थ ते पाहत जीव मुठीत धरून घरात बसले होते. अगदी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सागवान जंगलात व शेतांमध्ये हे चक्रीवादळ घुसले आणि गावकरी या विनाशकारी संकटातून वाचले.

 पावसाने बुलडाणा जिल्ह्यातही हजेरी लावली. जळगाव जामोद तालुक्यातील एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. रसुलपूर येथील अंजनाबाई प्रकाश वानखडे (वय ५0) व तिचे पती प्रकाश वानखडे हे शेतामधून घरी जात असताना अंजनाबाईच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.