शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

व-हाडात दमदार पाऊस; अकोला, वाशिममध्ये वादळीवा-याने हाहाकार!

By admin | Updated: September 17, 2015 23:59 IST

अकोला जिल्ह्यात चक्रीवादळाचा फटका, वाशिममधील ढोरखेडा गावात अनेक घरांची पडझड, बुलडाण्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू.

अकोला: वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी संततधार पाऊस बरसला. वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त होता. या जिल्ह्यातील ढोरखेडा गावातील जवळपास ४0 घरांची पडझड झाली असून, बुलडाणा जिल्ह्यात एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. अकोल्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील एका गावात चक्रीवादळाने अक्षरश: तांडव केले. या गावातील सागवानाची अख्खी झाडं वादळीवार्‍यात उडताना लोकांनी पाहीली.

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असला तरी, मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथे वादळीवारा आणि मुसळधार पावसाने ३0 ते ४0 घरांची पडझड झाली असून १३ जण जखमी झाले. सुसाट्याच्या वार्‍याने घरांवरील टिनपत्रे उडून गेले. भिंतींची पडझड झाली. काही झाडे घरांवर उन्मळून पडल्याने घरांची पडझड झाली. गावातील जवळपास ३0 ते ४0 घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घराच्या पडझडीत १३ जण जखमी असून, एक महिला गंभीर जखमी झाल्याने तिला अकोला येथे हलविण्यात आले. पंधरा दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा होता. त्यामुळे खरीप पिकांवर ताण आल्याने, सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा होती. अकोल्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ आणि पावसाचे वातावरण होते.

 सकाळी ११ वाजतापासून अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यात पाऊस सुरू झाला. या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात २१.0४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. बाश्रीटाकळी तालुक्यातील मुंगसाजीनगर या आदिवासीबहुल परिसराला चक्रीवादळाचा फटका बसला. जंगलातील शेकडो सागवान झाडे मुळासकट उखडून हवेत उडताना गावकर्‍यांनी पाहिले. ही विनाशकारी दृश्ये अनेकांनी ह्ययाची डोळाह्ण पाहिली. निसर्गाचे हे तांडव सुरू असताना ग्रामस्थ ते पाहत जीव मुठीत धरून घरात बसले होते. अगदी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सागवान जंगलात व शेतांमध्ये हे चक्रीवादळ घुसले आणि गावकरी या विनाशकारी संकटातून वाचले.

 पावसाने बुलडाणा जिल्ह्यातही हजेरी लावली. जळगाव जामोद तालुक्यातील एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. रसुलपूर येथील अंजनाबाई प्रकाश वानखडे (वय ५0) व तिचे पती प्रकाश वानखडे हे शेतामधून घरी जात असताना अंजनाबाईच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.