शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

खारघरच्या याचिकांवरील सुनावणी ३ आॅक्टोबरला

By admin | Updated: October 1, 2016 01:36 IST

पनवेल महापालिकेतून वगळण्यात यावे, यासाठी खारघर ग्रामपंचायत आणि ग्रामसभेने केलेल्या याचिकांवरील सुनावणी ३ आॅक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली.

मुंबई : पनवेल महापालिकेतून वगळण्यात यावे, यासाठी खारघर ग्रामपंचायत आणि ग्रामसभेने केलेल्या याचिकांवरील सुनावणी ३ आॅक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली. या दिवशी राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोग त्यांची भूमिका उच्च न्यायालयापुढे स्पष्ट करेल.खारघर ग्रामपंचायत स्वत:चा विकास करण्यास समर्थ आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेतून खारघरला वगळावे, अशी मागणी ग्रामपंचायत व ग्रामसभेने उच्च न्यायालयाकडे केली आहे. ‘सरकारने अधिसूचना काढून खारघरला ‘गावा’चा दर्जा दिला आहे. त्यामुळे खारघरचा समावेश महापालिकेत करण्यापूर्वी सरकारला हा दर्जा काढून घ्यावा लागेल. त्यासाठी घटनेचे अनुच्छेद २४३ (क्यु) अंतर्गत अधिसूचना काढावी लागेल. मात्र सरकारने या कायदेशीर प्रक्रियेला बगल देत खारघरचा थेट महापालिकेत समावेश केला. हा निर्णय घटनाबाह्य असल्याने खारघरला महापालिकेतून वगळावे. आधी राज्यपालांनी अधिसूचना काढावी. सरकारला ही प्रक्रिया पार पाडण्याचा अधिकार नाही,’ असा युक्तिवाद खारघर ग्रामपंचायत व ग्रामसभेने केला.पनवेल नगर परिषदेचे महापालिकेमध्ये रूपांतर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी खारघर ग्रामसभेने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आक्षेप घेतला. ‘पनवेल नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच एखाद्या नगर परिषदेचे महापालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या अधिसूचनेची आवश्यकता नाही,’ असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी केला. खंडपीठाने या याचिकांवरील सुनावणी ३ आॅक्टोबरपर्यंत तहकूब करीत राज्य सरकारला व राज्य निवडणूक आयोगाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)