शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

राज्यातील आघाडीत पुण्यावरून बिघाडी?

By admin | Updated: January 18, 2017 06:48 IST

राष्ट्रवादीने ताठरपणा दाखवल्यामुळे अन्य ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात निष्कारण कटुता येत आहे, अशी भावना काँग्रेसच्या राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली

अतुल कुलकर्णी,

मुंबई- पुणे महापालिका निवडणुकीत जागा सोडण्यावरून राष्ट्रवादीने ताठरपणा दाखवल्यामुळे अन्य ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात निष्कारण कटुता येत आहे, अशी भावना काँग्रेसच्या राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ताठरपणाची सुरुवात मुंबईतून झाल्याचे सांगत, काँग्रेसचा हा निनावी हल्ला परतवला आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली, तर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते, असा रिपोर्ट गुप्तवार्ता अधिकाऱ्यांनी गृहविभागास दिला आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या, तर भाजपापुढे ते आव्हान ठरू शकते, असे मत व्यक्त केले होते. यावर काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘आम्ही पुणे महापालिकेत आघाडी करण्याची भूमिका घेतली, पण अजित पवार यांनी ताठरपणा कायम ठेवला आहे. थोडी समजुतीची भूमिका घेतली, तर प्रश्न मार्गी लागू शकतील,’ असेही तो नेता म्हणाला.यावर तटकरे म्हणाले, ‘काँग्रेसने मुंबईत दोन महिने आधीच ‘आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही,’ अशी भूमिका जाहीर केली. त्याला ताठरपणा म्हणायचे नाही का? त्यांच्या या भूमिकेमुळेच आम्ही मग मुंबईत आमच्या काही उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली. आमची राज्यभर आघाडी करण्याची भूमिका आहेच, पण दोघांनीही एका पातळीवर येऊन तातडीने चर्चा केली पाहिजे,’ असे तटकरे म्हणाले. या बैठकीबद्दल विचारले असता, अशोक चव्हाण आघाडीचे निर्णय जिल्हा पातळीवर देण्यात आले आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी योग्य ते प्रस्ताव पाठवल्यास आम्ही त्याला होकारच देऊ. वास्तवाची जाणीव ठेवून निर्णय घेतले जातील, असे सांगून राष्ट्रवादीचे नेते शरद पवारदेखील आघाडीबद्दल सकारात्मक असल्याचे चव्हाण म्हणाले.काँग्रेसच्या सोमवारी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादीसोबत जायचे की नाही, असे थेट विचारले. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी बघा, सगळ्यांचे काय मत आहे तसे करा, असे गोलमोल उत्तर दिल्याचे समजते. पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीवर जुना राग आहे, पण आता रागलोभाच्या पलीकडे जाऊन निवडणुकांकडे पाहावे लागेल, असे सांगून व्यावहारिक भूमिका घ्यावी लागेल, असे मत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांंनी मांडल्याचे समजते.