शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युतीला संक्रांत आडवी

By admin | Updated: January 14, 2017 05:30 IST

शिवसेना-भाजपाच्या जागावाटपाचे प्रस्ताव इकडून-तिकडे गेले असले तरी संक्रांत आडवी आल्याने प्रत्यक्ष बोलणीचा मुहूर्त रविवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

मुंबई : शिवसेना-भाजपाच्या जागावाटपाचे प्रस्ताव इकडून-तिकडे गेले असले तरी संक्रांत आडवी आल्याने प्रत्यक्ष बोलणीचा मुहूर्त रविवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. तोपर्यंत पतंगबाजी रंगणार आहे.मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत युतीवर संक्रांत येणार की समझोत्याचा तीळगूळ वाटणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘युतीबाबत मी सकारात्मक आहे; पण भाजपाकडून येणारा प्रस्ताव अवास्तव असेल आणि तो स्वीकारणे शक्य नसेल तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा,’ असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाचे मंत्री आणि नेत्यांच्या बैठकीत दिल्याचे समजते. भाजपाकडून आम्हाला चर्चेचा प्रस्ताव आलेला आहे, १५ तारखेला बहुतेक चर्चा होईल, असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे युतीबाबत आता संक्रांतीनंतरच काय ते ठरणार आहे.सूत्रांनी सांगितले की, भाजपाकडून केवळ मुंबई महापालिका निवडणुकीतील समझोत्यासंदर्भात चर्चा करायची आहे, असा निरोप आल्यानंतर १५ तारखेला पहिली बैठक घेण्याचे ठरले आहे. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीसाठी सकारात्मक आहेत आणि ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहेच. त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी सांगितले की, समझोत्याचा कोणताही फॉर्म्युला भाजपाने अद्याप दिलेला नाही. तसेच शिवसेनेनेदेखील अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या मंत्री आणि नेत्यांच्या बैठकीत युतीसंदर्भात चर्चा झाली. भाजपाने अवाजवी (८० किंवा त्यापेक्षा जास्त) जागा मागितल्या तर युती केली जाणार नाही असा बैठकीचा सूर होता, अशी माहिती आहे. स्वबळावर लढलो तर आम्ही शंभरपेक्षा जास्त जागा जिंकू. युती म्हणून एकत्रितपणे लढलो तर १३० ते १३५ जागा दोघांना मिळतील. याचा अर्थ स्वबळावर लढण्याचा शिवसेनेला नक्कीच फायदा होईल, असे शिवसेनेच्या एका खासदाराने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. युती झाली तर शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसेल. तसेच, तगड्या बंडखोरांना मनसे आपल्या गळाशी लावून फायदा घेईल, असा तर्क स्वबळावर लढण्याची तीव्र इच्छा असलेले दोन्ही पक्षांतील नेते आपल्या शीर्षस्थ नेत्यांना देत आहेत. (विशेष प्रतिनिधी) चर्चा फक्त ठाणे-मुंबईपुरतीशिवसेना-भाजपामध्ये जागावाटपाची चर्चा फक्त मुंबई आणि ठाणे या दोन महानगरपालिका निवडणुकीपुरतीच असून, उर्वरित महापालिकांमध्ये युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.मुंबईत स्वबळावर लढणार काँग्रेस : मुंबई पालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही. हे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच तर राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी जाहीर केली, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. मात्र, एकटे निरुपम सोडले तर बाकीच्या नेत्यांना राष्ट्रवादीसोबत आघाडी हवी आहे, असे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांचे म्हणणे आहे.