शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

विद्यमान नगरसेवकांवर टांगती तलवार

By admin | Updated: October 3, 2016 05:49 IST

काही महिन्यांवर आल्या असल्या, तरी आपला वॉर्ड कायम राहील की नाही, याची शाश्वती नसल्याने मुंबईतील नगरसेवक कातावले आहेत.

गौरीशंकर घाळे,

मुंबई- महापालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्या, तरी आपला वॉर्ड  कायम राहील की नाही, याची शाश्वती नसल्याने मुंबईतील नगरसेवक कातावले आहेत. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाकडून महिला व मागासवर्गीय जागांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल. त्यानंतर प्रभाग फेररचनेच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून, ८० टक्के जागांवर फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोमवारी पालिकेतील २२७ जागांपैकी महिला आणि मागासवर्गीय जागांच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. स्थानिक स्वराज संस्थांमधील ५० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असतात, तर लोकसंख्येच्या आधारावर यंदा अनुसूचित जातींसाठी १५ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. आरक्षणाच्या लॉटरीत आपला पत्ता कापला जाऊ नये, यासाठी उमेदवारांनी अक्षरश: देव पाण्यात ठेवले आहेत. त्यातच प्रशासनाने केलेल्या फेररचनेमुळे मोठ्या प्रमाणावर विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग बदलले जाण्याची शक्यता आहे. तब्बल ८० टक्के नगरसेवकांना विद्यमान आणि हक्काचे मतदार गमवावे लागणार आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या राजकारणावर पाणी पडल्याची भावना नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पाच वर्षे जो मतदार सांभाळला, त्यांना सोडून आता नव्याच मतदारांना खूश करण्याची धडपड उमेदवारांना करावी लागणार आहे. आज आरक्षणाची सोडत झाल्यानंतर, ५ तारखेला फेररचनेचा आराखडा जाहीर केला जाईल. ५ ते २० आॅक्टोबरपर्यंत या फेररचनेबाबत सूचना आणि तक्रारी करता येणार आहेत. यावर ५ नाव्हेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून सुनावणी घेतली जाईल. १८ नोव्हेंबर रोजी आयोगाकडून फेररचनेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असून, २२ नोव्हेंबरला फेररचनेची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. सूचना-तक्रारींची सोय असली, तरी आयोगाकडून प्रसिद्ध होणारी पहिली यादी निहीत प्रक्रियेत असते. त्यात नंतर फार मोठे बदल होण्याची शक्यता नसते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

>मतदारांना आकर्षित करण्याचे आव्हान

उपनगरातील केवळ १५ प्रभागच मागील निवडणुकीप्रमाणे राहणार आहेत. त्यात कसलाच फेरबदल नसणार. या व्यतिरिक्त तब्बल २५ ते ३० प्रभागांच्या रचनेत ८० टक्क्यांपर्यंत बदल सुचविण्यात आला आहे, तर उर्वरित सर्व जागांवर ३५ ते ४० टक्के बदल आहेत.