शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

टॅक्सी-रिक्षाचालकांच्या मनमानीला लगाम

By admin | Updated: May 21, 2016 01:59 IST

एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून रिक्षा-टॅक्सीचालकाला विचारणा होताच काही चालकांकडून भाडे नाकारले जाते

मुंबई : एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून रिक्षा-टॅक्सीचालकाला विचारणा होताच काही चालकांकडून भाडे नाकारले जाते आणि मनमानी कारभाराचे दर्शन घडविले जाते. या मनमानी कारभाला मुंबई वाहतूक पोलिसांकडून लगाम लावण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांत भाडे नाकारण्याच्या ३,८0९ केसेस वाहतूक पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. भाडे नाकारणे, मनमानी पद्धतीने भाडे आकारणी यासारख्या तक्रारी प्राप्त होताच मुंबई वाहतूक पोलिसांकडून रिक्षा-टॅक्सी चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. टॅक्सीचालकांविरोधात मुंबई शहरातील चर्चगेट आणि सीएसटी परिसर, मुंबई सेंट्रल, एलफिन्स्टन, लोअर परेल, दादर, सायन, भायखळा तर रिक्षाचालकांविरोधात वांद्रे, खार, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली, मालाड, बोरीवली, सायन भागातून सर्वाधिक तक्रारी येत आहेत. यात मनमानी पद्धतीने भाडे आकारण्यापेक्षा भाडे नाकारण्याच्या तक्रारी अधिक असल्याचे वाहतूक पोलिसांतील सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र त्याला लगाम लावण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे. जानेवारी महिन्यात भाडे नाकारण्याच्या रिक्षाचालकांविरोधात ३८७ केसेस तर टॅक्सीचालकांविरोधात १९७ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात प्रवाशांकडून करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून त्याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाईही केली आहे. एप्रिलमध्ये रिक्षाचालकांविरोधात १ हजार ५९१ तर टॅक्सीचालकांविरोधात ५६१ केसेस दाखल झाल्या आहेत. मागील चार महिन्यांत एकूण ३ हजार ८0९ केसेसची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)भाडे नाकारण्याच्या तक्रारी दाखल होताच त्यांच्यावर २00 रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र कोर्टात प्रकरण जाताच जादा दंड आकारणीही होत असल्याची माहिती देण्यात आली.