शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

मुंबई पंतप्रधानांच्या हवाली करा

By admin | Updated: December 8, 2014 08:41 IST

मुंबईच्या विकास प्रक्रि येत केंद्र शासनाचा सहभाग मोठा आहे, त्यामुळे मुंबईच्या प्रश्नाचा तातडीने निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना केली पाहिजे,

नवी दिल्ली : मुंबईच्या विकास प्रक्रियेत केंद्र शासनाचा सहभाग मोठा आहे, त्यामुळे मुंबईच्या प्रश्नाचा तातडीने निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना केली पाहिजे, अशी आग्रहवजा सूचना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालीरविवारी झालेल्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत केली.महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन केंद्राने सढळहस्ते मदत करावी, कापूस आणि ऊस पीकाला योग्य भाव मिळण्यासाठी विशेष योजना तयार करावी अशी मागणीही त्यांनीकेली.बैठकीत फडणवीस यांनी नियोजन आयोगाची उपयोगिता संपली असून त्याऐवजी अधिक विस्तारित आण िराज्यांच्या अधिक सहभाग असलेली राष्ट्रीय आर्थिक विकास व सुधारणा मंडळ अशी संस्था तयार करण्यात यावी,या भूमिकेवर जोर दिला. ते म्हणाले, या रचनेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व पूर्वोत्तर अशी प्रादेशिक मंडळे तयार करण्यात यावीत. पंतप्रधान हे त्या मंडळांचे अध्यक्ष असतील व राज्यांचे मुख्यमंत्री सदस्य असतील, दर तीन महिन्यांनी या प्रादेशिक मंडळाची व राष्ट्रीय मंडळाची बैठक दरवर्षी घेण्यात यावी. देशाचे नियोजन पाच वर्षाचे न राहता ते दीर्घ काळासाठी केले पाहिजे. आर्थिक आणि कायदेशीर बाबींवर केंद्र व राज्यांमध्ये चर्चा होऊन कायदे तयार केले पाहिजेत. सीआरझेड, इको सेन्सीटीव्ह झोन, भुमिअधिग्रहण कायदा आदी कायदयांमुळे विकासात अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे राज्यांशी चर्चा करून या केंद्रीय कायद्यांमध्ये बदल व्हायला हवा.प्रादेशिक मंडळाचे निर्णय राष्ट्रीय कार्यसूची म्हणून मान्य व्हायला हवेत. केंद्राचा निधी वर्षाच्या शेवटी न वितरित करता तो नियमति वितरीत केला जावा. राष्ट्रीय रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा योजना राबविण्याकरिता राज्यांना थेट निधी दिला पाहिजे. या योजना राबविण्यासाठी राज्यांना त्यांचे नियोजन व अंमलबजावणी करण्याची सवलत दिली पाहिजे, अशी भूमिकाही फडणवीस यांनी मांडली. (विशेष प्रतिनिधी)