शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पंतप्रधानांच्या हवाली करा

By admin | Updated: December 8, 2014 08:41 IST

मुंबईच्या विकास प्रक्रि येत केंद्र शासनाचा सहभाग मोठा आहे, त्यामुळे मुंबईच्या प्रश्नाचा तातडीने निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना केली पाहिजे,

नवी दिल्ली : मुंबईच्या विकास प्रक्रियेत केंद्र शासनाचा सहभाग मोठा आहे, त्यामुळे मुंबईच्या प्रश्नाचा तातडीने निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची स्थापना केली पाहिजे, अशी आग्रहवजा सूचना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालीरविवारी झालेल्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत केली.महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन केंद्राने सढळहस्ते मदत करावी, कापूस आणि ऊस पीकाला योग्य भाव मिळण्यासाठी विशेष योजना तयार करावी अशी मागणीही त्यांनीकेली.बैठकीत फडणवीस यांनी नियोजन आयोगाची उपयोगिता संपली असून त्याऐवजी अधिक विस्तारित आण िराज्यांच्या अधिक सहभाग असलेली राष्ट्रीय आर्थिक विकास व सुधारणा मंडळ अशी संस्था तयार करण्यात यावी,या भूमिकेवर जोर दिला. ते म्हणाले, या रचनेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व पूर्वोत्तर अशी प्रादेशिक मंडळे तयार करण्यात यावीत. पंतप्रधान हे त्या मंडळांचे अध्यक्ष असतील व राज्यांचे मुख्यमंत्री सदस्य असतील, दर तीन महिन्यांनी या प्रादेशिक मंडळाची व राष्ट्रीय मंडळाची बैठक दरवर्षी घेण्यात यावी. देशाचे नियोजन पाच वर्षाचे न राहता ते दीर्घ काळासाठी केले पाहिजे. आर्थिक आणि कायदेशीर बाबींवर केंद्र व राज्यांमध्ये चर्चा होऊन कायदे तयार केले पाहिजेत. सीआरझेड, इको सेन्सीटीव्ह झोन, भुमिअधिग्रहण कायदा आदी कायदयांमुळे विकासात अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे राज्यांशी चर्चा करून या केंद्रीय कायद्यांमध्ये बदल व्हायला हवा.प्रादेशिक मंडळाचे निर्णय राष्ट्रीय कार्यसूची म्हणून मान्य व्हायला हवेत. केंद्राचा निधी वर्षाच्या शेवटी न वितरित करता तो नियमति वितरीत केला जावा. राष्ट्रीय रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा योजना राबविण्याकरिता राज्यांना थेट निधी दिला पाहिजे. या योजना राबविण्यासाठी राज्यांना त्यांचे नियोजन व अंमलबजावणी करण्याची सवलत दिली पाहिजे, अशी भूमिकाही फडणवीस यांनी मांडली. (विशेष प्रतिनिधी)