शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

हापूसला पंधरवड्यात नुकसानभरपाई

By admin | Updated: May 29, 2015 00:02 IST

मुख्यमंत्री : मार्गताम्हाणेतील कार्यक्रमात ग्वाही ; कोकणच्या पर्यटन विकासासाठी पाच वर्षांचा आराखडा

गुहागर : अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. नुकसानभरपाई नेमकी कशी द्यावी, याचा अहवाल देण्याची सूचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे. येत्या पंधरा दिवसांत या भरपाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील पद्मावती देवी मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा फडणवीस यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वसंतराव भागवत, डॉ. तात्या नातू यांच्या कर्मभूमीत यायला मिळाले हे भाग्यच असल्याचे सांगताना संस्काराच्या भक्कम पायावरच मुख्यमंत्री होता आल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.सर्व प्रकारांची शिल्पे एकत्र करून हे मंदिर बांधले गेले आहे. भारताचा एकसंधपणा यातून दिसतो. हे मंदिर समाज परिवर्तनाचे केंद्र झाले पाहिजे, असे ते म्हणाले. कोकणात भरपूर पाऊस पडूनही शेतीसाठी, फलोत्पादनासाठी उपयोग होत नाही. पावसाचे सर्व पाणी समुद्राला मिळते. त्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याची चळवळ उभारण्याचे काम जोमाने सुरूआहे. महाराष्ट्रात ६ हजार गावात ७० हजार कामे जलयुक्त शिवार योजनेतून सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसहभागातून ४२ कोटी रुपयांची कामे केली. खटाव व माणसारख्या दुष्काळी गावातून एवढ्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे की, पुढील काळात तेथे टँकर द्यावा लागणार नाही. महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडूनही काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष नियोजन करून गावागावांत पाण्याचे विकेंद्रित साठे निर्माण करून त्या माध्यमातून गावाची उत्पन्न क्षमता कशी वाढेल, यावर भर देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.पर्यटन हे कोकणचे बलस्थान आहे. पाच वर्षे योग्य प्रकारे नियोजन केले तर गोव्यापेक्षा जास्त पर्यटक कोकणामध्ये दिसू शकतात एवढी कोकणाची क्षमता आहे. यासाठी जिल्ह्याचा पर्यटन आराखडा करण्याचे काम सुुरू आहे. सिंधुदुर्गमधील सी-वर्ल्डचा प्रश्न सोडविण्यात आला. या प्रकल्पासाठी ८०० एकर एवढी अनावश्यक जागा कमी करून दोनशे एकर केल्यानंतर लोकांनी चांगले सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.या मंदिरामध्ये पुढील काळात संस्कार केंद्र चालविली जाणार असून, मार्गताम्हाणे गावाच्या विकासासाठी हे गाव दत्तक घेतल्याचे भाजप प्रवक्ते मधू चव्हाण यांनी जाहीर केले. यावेळी आमदार भास्कर जाधव, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, बाळ माने, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार योजनेला मागणीजलयुक्त शिवार योजनेत आम्हालाही सहभागी करा, अशी गावागावांतून मागणी होत आहे. जलयुक्त शिवार योजना येथे संपत नाही. पाण्याचे नीट नियोजन केल्यानंतर शेती विकास व मार्केटिंगपर्यंत संपूर्ण साखळी तयार करण्याचे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.यावर्षी आंब्यावर मोठे संकट आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा झाली आहे. कशा प्रकारे मदत करायची याचा अहवाल देण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्यावर पुढील दोन मंत्रिमंडळांमध्ये निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.