शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या अर्ध्या जागा रिक्त

By admin | Updated: May 23, 2017 05:38 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव जागांवर राज्यभरातील शाळांमध्ये अद्याप ५० टक्केही प्रवेश झालेले नाहीत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये चार ते पाच फेऱ्या पूर्ण होऊनही

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव जागांवर राज्यभरातील शाळांमध्ये अद्याप ५० टक्केही प्रवेश झालेले नाहीत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये चार ते पाच फेऱ्या पूर्ण होऊनही तब्बल ६२ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. ग्रामीण भागात मिळालेला अत्यल्प प्रतिसाद आणि पालकांकडून ठराविक शाळांना असलेल्या मागणीमुळे प्रवेश कमी झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात सर्वाधिक सुमारे १० हजार प्रवेश एकट्या पुणे जिल्ह्यात झाले आहेत.राज्यात आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी एकूण ८ हजार २७८ शाळांमध्ये १ लाख २० हजार ५४३ जागा उपलब्ध आहेत. यंदा या जागांवर प्रवेशासाठी राज्यात पहिल्यांदाच सर्व जिल्ह्यांत आॅनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशासाठी १ लाख ४४ हजार ८५७ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमधून संगणकाद्वारेच लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत पाच लॉटरी फेऱ्या झाल्या आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही आतापर्यंत चार किंवा पाच फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ ५८ हजार ८ प्रवेश झाल्याचे शिक्षण विभागाच्या आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.राज्यात अद्याप ५० टक्केही प्रवेश पूर्ण झाले नसून तब्बल ६२ हजार ५३५ जागा रविवारअखेरपर्यंत रिक्त राहिल्या आहेत. एकूण प्राप्त अर्जांपैकी सुमारे ५८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल,े तरी अनेक विद्यार्थ्यांची काही शाळांमध्ये निवड होऊनही त्यांनी प्रवेश घेतला नाही. काही विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रवेश मिळालेला नाही. तर अनेक पालकांनी अर्ज करताना ठराविक शाळेलाच पसंती दिल्याचे दिसते. त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश पूर्ण झाल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच ग्रामीण भागात अद्यापही आरटीई प्रवेशाबाबत तेवढी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे प्रवेश क्षमतेपेक्षा जादा अर्ज येऊनही रिक्त जागांची संख्या अधिक आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.यंदा अधिक प्रवेश मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आरटीईच्या प्रवेशामध्ये वाढ झाली आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यात सर्वत्र आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात असल्याने सोपी झाली आहे. शहरी भागांतील पालकांना याबाबत पुरेशी माहिती झाली झाली आहे. मागील वर्षी यंदाच्या तुलनेत ४० ते ४५ टक्केच प्रवेश झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्राथमिकचे प्रभारी शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी आरटाईची प्रक्रिया अद्याप सुरू असून शंभर टक्के प्रवेश होतील, असा दावा केला आहे.पुणे जिल्हा आघाडीवरराज्यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार ९७१ प्रवेश झाले आहेत. जिल्ह्यात सुमारे १५ हजार ७०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी तब्बल ३६ हजार ९३३ अर्ज आले असून त्यातही पुणे आघाडीवर आहे. तर, राज्यात सर्वाधिक १६ हजार ४५६ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात केवळ ४ हजार ३६२ प्रवेश झाले आहेत. पुण्यापाठोपाठ नागपूर, ठाणे, नाशिक आणि मुंबई यांचा क्रमांक लागतो.