शहरं
Join us  
Trending Stories
1
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
2
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
3
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
4
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
5
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
6
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
7
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
8
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
9
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
10
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
11
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
12
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
13
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
14
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
15
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
17
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
18
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
19
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
20
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका

आरटीईच्या अर्ध्या जागा रिक्त

By admin | Updated: May 23, 2017 05:38 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव जागांवर राज्यभरातील शाळांमध्ये अद्याप ५० टक्केही प्रवेश झालेले नाहीत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये चार ते पाच फेऱ्या पूर्ण होऊनही

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव जागांवर राज्यभरातील शाळांमध्ये अद्याप ५० टक्केही प्रवेश झालेले नाहीत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये चार ते पाच फेऱ्या पूर्ण होऊनही तब्बल ६२ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. ग्रामीण भागात मिळालेला अत्यल्प प्रतिसाद आणि पालकांकडून ठराविक शाळांना असलेल्या मागणीमुळे प्रवेश कमी झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात सर्वाधिक सुमारे १० हजार प्रवेश एकट्या पुणे जिल्ह्यात झाले आहेत.राज्यात आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी एकूण ८ हजार २७८ शाळांमध्ये १ लाख २० हजार ५४३ जागा उपलब्ध आहेत. यंदा या जागांवर प्रवेशासाठी राज्यात पहिल्यांदाच सर्व जिल्ह्यांत आॅनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशासाठी १ लाख ४४ हजार ८५७ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमधून संगणकाद्वारेच लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत पाच लॉटरी फेऱ्या झाल्या आहेत. इतर जिल्ह्यांमध्येही आतापर्यंत चार किंवा पाच फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ ५८ हजार ८ प्रवेश झाल्याचे शिक्षण विभागाच्या आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.राज्यात अद्याप ५० टक्केही प्रवेश पूर्ण झाले नसून तब्बल ६२ हजार ५३५ जागा रविवारअखेरपर्यंत रिक्त राहिल्या आहेत. एकूण प्राप्त अर्जांपैकी सुमारे ५८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल,े तरी अनेक विद्यार्थ्यांची काही शाळांमध्ये निवड होऊनही त्यांनी प्रवेश घेतला नाही. काही विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रवेश मिळालेला नाही. तर अनेक पालकांनी अर्ज करताना ठराविक शाळेलाच पसंती दिल्याचे दिसते. त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश पूर्ण झाल्यानंतर इतर विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच ग्रामीण भागात अद्यापही आरटीई प्रवेशाबाबत तेवढी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे प्रवेश क्षमतेपेक्षा जादा अर्ज येऊनही रिक्त जागांची संख्या अधिक आहे, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.यंदा अधिक प्रवेश मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आरटीईच्या प्रवेशामध्ये वाढ झाली आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यात सर्वत्र आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात असल्याने सोपी झाली आहे. शहरी भागांतील पालकांना याबाबत पुरेशी माहिती झाली झाली आहे. मागील वर्षी यंदाच्या तुलनेत ४० ते ४५ टक्केच प्रवेश झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्राथमिकचे प्रभारी शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी आरटाईची प्रक्रिया अद्याप सुरू असून शंभर टक्के प्रवेश होतील, असा दावा केला आहे.पुणे जिल्हा आघाडीवरराज्यात आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ९ हजार ९७१ प्रवेश झाले आहेत. जिल्ह्यात सुमारे १५ हजार ७०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी तब्बल ३६ हजार ९३३ अर्ज आले असून त्यातही पुणे आघाडीवर आहे. तर, राज्यात सर्वाधिक १६ हजार ४५६ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्यात केवळ ४ हजार ३६२ प्रवेश झाले आहेत. पुण्यापाठोपाठ नागपूर, ठाणे, नाशिक आणि मुंबई यांचा क्रमांक लागतो.