शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

बागायतदारांना वरदान केळीची जी-९

By admin | Updated: August 25, 2016 03:07 IST

केळी बागायती दिवसेंदिवस कमी होत असतांना जी-९ या टिश्यूकल्चर केळीची जात बागायतदारांना वरदान ठरणारी आहे.

वसई : वाढते औद्यागिकरण आणि रोगराईमुळे वसईच्या केळी बागायती दिवसेंदिवस कमी होत असतांना जी-९ या टिश्यूकल्चर केळीची जात बागायतदारांना वरदान ठरणारी आहे. शनिवार दि.२७ आॅगस्ट रोजी शनी मंदिर वाघोली, ट्रस्टच्यावतीने शेतकऱ्यांना जी-९ या टिश्यूकल्चर केळीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. भरघोस पीक आणि रोगराईमुक्त पीक अशी या जातीची वैशिष्ट्ये आहेत.गेल्या काही वर्षात केळींवर आलेल्या रोगांमुळे शेतकरी तिच्या लागवडीकडे पाठ फिरवायला लागले आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना पुन्हा केळीच्या शेतीकडे वळविणे गरजेचे होते. त्यासाठी उपयुक्त ठरणारी जी-९ ही जात रोगराईपासून मुक्त व कमी उंचीची असून एक सारख्या वाढीमुळे जास्त उत्पादन देते. या केळीच्या झाडांची लागवड वसईतील वातावरणास पूरक आहे.वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर व उपमहापौर उमेश नाईक यांच्या हस्ते वसईतील शेतकऱ्यांना या रोपांचे वाटप होणार आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबनशेठ नाईक व मनपाचे नगरसेवक उपस्थित रहाणार आहेत. प्रायोगिक तत्वावर सध्या जी-९ टिश्यू कल्चर केळींची ५००० रोपे शेतकऱ्यांना लागवडीसाठी मोफत वाटली जाणार आहेत. त्यांची लागवड कशी करावी, याबाबत मार्गदर्शनही यावेळी करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी १ लाख केळीची रोपे वाटण्यात आली होती. (प्रतिनिधी)>सुकेळी हे एकेकाळी आपल्या वसईची ओळखकेळीच्या बागा आणि सुप्रसिद्ध सुकेळी हे एकेकाळी आपल्या वसईची ओळख होते. अनेक जातींच्या केळींची लागवड वसईकर शेतकरी वर्षानुवर्षे करीत आहेत. राजेळी, वेलची, आंबट वेलची, भूरकेळ, हिरव्या सालीची (बसराई/बसरी) केळी, बनकेळ, मूठेळी, तांबडी (तांबड्या सालीची) तसेच सध्या प्रचलीत असलेली हजारी केळींची लागवड वसईत माठ्या प्रमाणात होत असे. त्यापैकी मूठेळी ही केळीची जात आता वसईतून नामशेष झाली आहे. बनकेळ ही जातही आता दुर्मीळ होत चालली आहे.केतकीच्या सपाट्यात म्हसकेळचा बळीवसईतील या केळ्यांना मुंबई बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी होती. म्हसकेळ या जातीच्या केळी फार लोकप्रिय होत्या. पण काही वर्षांपूर्वी पर्णगुच्छ (केतकी) नावाचा रोग आल्यामुळे ही जात त्याला बळी पडली. वसईतील शेतकऱ्यांनी इतर जातीच्या केळी अजूनही टिकवून ठेवल्या आहेत. केळीच्या विविध उपयोगांमुळे केळीच्या झाडांना कल्पतरू म्हटलं जातं. परंतु सध्या केळीच उत्पादन घेण शेतकऱ्यांना जिकरीचं होऊन बसलेले असताना या नव्या जातींमुळे आता वसई तालुक्यातील केळी लागवड पुन्हा एकदा भरभराटीला येण्याची चिन्हे दिसत आहेत.