शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत राहावे

By admin | Updated: October 12, 2016 06:53 IST

सध्या गोरक्षेच्या मुद्द्यावरून देशात अकारण मोठा वाद निर्माण करण्यात येत आहे. गोरक्षा व्हायलाच हवी; मात्र गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे

नागपूर : सध्या गोरक्षेच्या मुद्द्यावरून देशात अकारण मोठा वाद निर्माण करण्यात येत आहे. गोरक्षा व्हायलाच हवी; मात्र गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, उत्तेजित होऊन नाही, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला. काश्मीरच्या प्रश्नावर केंद्र सरकारने आक्रमक भूमिका कायम ठेवावी, असे प्रतिपादनही त्यांनी या वेळी केले. नव्या गणवेशातील संघाच्या पहिला विजयादशमी उत्सव मंगळवारी सकाळी रेशीमबाग मैदान येथे पार पडला. या वेळी मुख्य अतिथी म्हणून १९७६च्या भारतीय आर्थिक सेवेचे अधिकारी सत्यप्रकाश राय हे उपस्थित होते. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली लष्कराने जे काम करून दाखवले ते अभिनंदनीय आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान असून, भारतीय जवानांनी पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरामुळे जगाच्या पाठीवर भारताची मान उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कूटनीतीमुळे पाकिस्तानला एकटे पाडण्यात यश आले आहे, अशा शब्दांत कौतुक करत सरसंघचालकांनी पंतप्रधानांची पाठ थोपटली. केंद्रातील व राज्यातील सध्याचे सरकार काम करणारे आहे, उदासीन नाही. अजून बरंच काम बाकी आहे, पण सध्या जे काम सुरू आहे ते पाहून देश खूप पुढे जाईल असा विश्वास जनतेला वाटतो, असे भागवत म्हणाले.सरसंघचालकांच्या भाषणाअगोदर शस्त्रपूजन करण्यात आले. शिवाय प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरात संचलन केले तसेच शारीरिक कवायती सादर केल्या. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पश्चिम क्षेत्र संघचालक जयंत भाई भाडेसिया, विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर संघचालक दिलीप लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे तसेच विदेशातून आलेले स्वामी ब्रह्मदेव, स्वामी आनंदगिरी, डॉ. टोनी, राजा लुईस हे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)