शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

जीएसटीमुळे आर्थिक डबघाईचा धोका; विरोधकांचा आक्षेप

By admin | Updated: May 23, 2017 04:17 IST

बहुचर्चित वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यास देशात क्रांतीकारी बदल घडूृन येतील असा दावा सरकारकडून केला जात असला तरी, नियमातील तफावत व त्रुटीमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बहुचर्चित वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यास देशात क्रांतीकारी बदल घडूृन येतील असा दावा सरकारकडून केला जात असला तरी, नियमातील तफावत व त्रुटीमुळे राज्याचे तीस टक्के उत्पन्न कमी होणार आहे. परिणामी, राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला येण्याचा धोका आहे, अशी टीका विरोधकांनी विधान परिषदेत केली. वस्तू व सेवाकरासंबंधीचे विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या चर्चेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या उत्पन्नात दहा हजाराची घट झाली असून जीएसटीनंतर ही तूट आणखी वाढत जाणार आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारने १५ वर्षात २ लाख कोटीचे कर्ज केले होते. मात्र या सरकारने केवळ दोन वर्षामध्ये जवळपास एक लाख कोटी कर्जाचा डोंगर निर्माण केला आहे. आता एक जुलैपासून जीएसटी लागू केल्यास ही तूट ३६ हजार कोटीपर्यत वाढत जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी पुढाकार घेवून मुंबईसह अन्य महापालिकेत सरळ कर जातील याची कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी राणे यांनी केली. विरोधीपक्ष नेते मुंडे म्हणाले, पंतप्रधान मोदी व भाजपा जीएसटीचे श्रेय घेत असले तरी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हेच या श्रेयाचे खरे धनी आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेद्र मोदी यांनी यास विरोध केला होता. नव्या करप्रणालीमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर कसे असतील, याबाबत संभ्रमावस्था असून दरातील तफावतीमुळे काळाबाजार होण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जाणार आहे. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली.