शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

महाविद्यालयांच्या संख्येसोबत दर्जा वाढावा

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

देशाच्या विकासात उच्चशिक्षणाचा महत्त्वाचा वाटा असतो. देशात अभियांत्रिकी संस्थांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हे चांगले संकेत आहे. परंतु त्यातुलनेत तांत्रिक बाबींमध्ये

रघुनाथ शेवगावकर : रायसोनी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ साजरानागपूर : देशाच्या विकासात उच्चशिक्षणाचा महत्त्वाचा वाटा असतो. देशात अभियांत्रिकी संस्थांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हे चांगले संकेत आहे. परंतु त्यातुलनेत तांत्रिक बाबींमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचा फारसा प्रभाव नाही. नवीन अभियांत्रिकी व विज्ञान महाविद्यालये सुरू होण्यासोबतच आवश्यकता असताना शिक्षणाच्या दर्जादेखील वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत ‘आयआयटी-दिल्ली’चे संचालक डॉ. रघुनाथ शेवगावकर यांनी व्यक्त केले. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पहिल्या पदवीदान समारंभादरम्यान ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.रायसोनी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ अणुवैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुप कुमार, रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी हे प्रामुख्याने उपस्थित होते. पदवी मिळाली म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण संपत नाही. उलट नवनवीन शिक्षणाची द्वारे उघडतात. अभियांत्रिकी आणि नाविन्यपूर्ण संशोधन या दोन्ही बाबी एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनी पारंपरिक कक्षेबाहेर जाऊन संशोधनाला प्रोत्साहन दिले पाहिजे, असा सल्ला डॉ. शेवगावकर यांनी दिला. डॉ. काकोडकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. भारत ‘पीपीपी’च्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) माध्यमातून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तरुणांची लोकसंख्या लक्षात घेता संशोधन, अभियांत्रिकी आणि तांत्रिक क्षमतेला वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्राध्यापकांनीदेखील विद्यार्थ्यांमध्ये जास्तीतजास्त आत्मविश्वास जागृत करण्यावर भर दिला पाहिजे, असे डॉ. काकोडकर म्हणाले. प्रभारी कुलगुरू अनुप कुमार यांनी पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पदवी मिळणे हा प्रत्येकासाठी गौरवाचा क्षण असतो आणि पुढील आयुष्यात पदवीचे सार्थक व्हावे यासाठी प्रयत्न करा, या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. रासयोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी यांनी संस्थेची वाटचाल व प्रगतीविषयी माहिती दिली. संस्थेच्या संचालिका डॉ. प्रीती बजाज यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते अभियांत्रिकीतील स्नातक, स्नातकोत्तर अभ्यासक्रमांसोबतच ‘एमबीए’, ‘एमसीए’च्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. (प्रतिनिधी)