शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वार्षिक सकल उत्पादनात कृषी, पशूसंवर्धनाचा टक्का वाढतोय!

By admin | Updated: January 21, 2017 02:55 IST

अकोला येथे राज्यस्तरीय पशुचिकित्सालयीन अधिवेशन.

अकोला, दि. २0- देशाच्या दरडोई वार्षिक सकल उत्पादनात कृषी आणि पशूसंवर्धनाचा टक्का वाढत असून, या उत्पादनाकडे सरकार लक्ष ठेवून असल्याने उत्पादनाचा हा टक्का अधिक वाढविण्यासाठी या क्षेत्रातील संस्था जोमाने कामाला लागल्या आहेत. तसेच नवे संशोधन तंत्रज्ञान विकसित करू न शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आदित्यकु मार मिश्रा यांनी शुक्रवारी केले.महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणार्‍या अकोला येथील स्नातकोत्तर पशूवैद्यक व पशूविज्ञान संस्थेच्यावतीने कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात शुक्रवारी एकदिवसीय अधिवेशन संपन्न झाले आहे. याप्रसंगी डॉ. मिश्रा बोलत होते.अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी.दाणी यांनी केले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अदित्यकुमार मिश्रा होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. एन.पी.दक्षिणकार, विभागीय सहआयुक्त डॉ.पी.एस.चव्हाण, पीजीव्हाव्हीआयचे अधिष्ठात डॉ.हेमंत बिराडे, डॉ. सुनील वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. मिश्रा यांनी कृषी व पशूसंवर्धन देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावत असून, दरडोई वार्षिक सकल उत्पादनात (जाडीपी) कृषीचा २५ तर पशूसंवर्धनाचा ५ टक्के वाटा असल्याचे सांगितले. कृषीप्रधान देशात ही जमेची बाजू असल्याचे ते म्हणाले. विकासाच्या दृष्टीने विद्यापीठ जोमाने काम करीत असून, पशू व विद्यापीठांतर्गत पशू रुग्णालयात आधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यामुळे जनावरांच्या आजाराचे निदान तंतोतत व तातडीने होणार आहे. शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना डोळ्य़ासमोर ठेवून संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ.दाणी यांनी शास्त्रज्ञांनी विकसित केलेले संशोधन व तंत्रज्ञान तळागळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, तसेच संशोधन तंत्रज्ञानाचा अवलंब होणे गरजेचे आहे, तेव्हाच शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल, असे प्रतिपादन केले. आर्थिक विकासाच्या दृष्टिने महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या या क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. दक्षिणकर यांनी या विषयावर विस्तृत विवेचन केले.राज्यातील पहिल्या राज्यस्तरीय पशूचिकित्सालयीन अधिवेशनात औषधोपचार, शस्त्रक्रिया, प्रसूतिशास्त्र अंतर्गत उपचार केलेल्या विविध पाळीव व पशू रुग्णांचा उपचारात्मक अहवाल सादर करण्यात आला. दिवसभर चार तांत्रिक सत्र पार पडले. राज्यातील जवळपास २५0 शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कर्नाटकहून विद्यार्थी, शास्त्रज्ञ उपस्थित होते. पशूविज्ञान विद्यापीठ व स्नातकोत्तर पशूवैद्यक व पशूविज्ञान संस्थेचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.