शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशात वाढता असंतोष, बेकारी

By admin | Updated: April 30, 2016 01:15 IST

माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे. हा समाज सर्वांनी लायक ठेवला पाहिजे.

पिंपरी : माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे. हा समाज सर्वांनी लायक ठेवला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आपण सर्व जण ही प्रतिज्ञा घेऊ. देशात असंतोष वाढत आहे. बेकारी वाढत चालली आहे. शिक्षण व आरोग्य महाग झाले आहे. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषद व लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात श्रम-उद्योग परिषद आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आले. त्या वेळी वैद्य बोलत होते. निवृत्त कामगार आयुक्त टी. जी. चोळके, ऱ्मनोहर पारळकर, ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, बथुवेल बलिद, परशुराम बोऱ्हाडे, पी. के. सावंत आदी उपस्थित होते. वैद्य म्हणाले, आंबेडकरांच्या विचारांचे चिंतन व मनन केले पाहिजे. वाढती बेकारी समाज गिळंकृत करेल. कारखाना मनुष्यविरहीत होऊ शकतो. माणसाचे जीवन महत्त्वाचे आहे. त्याचा विचार केला पाहिजे. कामगारांचे जीवन अवघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात आहेत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. देशाच्या आर्थिक प्रगतीबरोबरच मानव विकास निर्देशांकही वाढला पाहिजे.उपेक्षित कष्टकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. स्मशानभूमी सेवक सोना प्रधान, चर्मकार मधुकर वाघ, शवविच्छेदन मजूर सचिन घोलप, मोलकरीण संगीता साठे, रखवालदार धनसुख पटेल, बांधकाम मजूर रामकंवर जाधव, सफाई मजूर रंजना बालघरे, भाजीविक्रेते ठकाजी नरड यांना सन्मानित करण्यात आले. गिरीश प्रभुणे यांना दिनबंधू पुरस्कार, उद्योजक रामदास माने यांना राष्ट्रीय निर्मलग्राम मित्र पुरस्कार, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय घोडके यांना कर्मचारी हितसंवर्धन संघटना पुरस्कार देण्यात आला. राजेंद्र वाघ व दत्तात्रय तरटे यांना महाराष्ट्र श्रमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राजेंद्र वाघ यांनी कामगारांवर आधारित निर्भीड ही कविता सादर केली. प्रभुणे, पारळकर यांनी विचार व्यक्त केले. चोळके यांनी अध्यक्षीय भाषण केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. आभार परशुराम बोऱ्हाडे यांनी मानले. (प्रतिनिधी)>श्रमाची चीज : भीती माहीत नाहीकार्यक्रमात कष्टकऱ्यांची प्रगट मुलाखत घेताना पुरुषोत्तम सदाफुले यांनी स्मशानभूमी सेवक सोनाबाई प्रधान यांना स्मशानात काम करताना तुम्हाला भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारला. त्या वेळी प्रधान म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत काम करीत आहे. भीती कुठे आहे, मला माहीत नाही. माझ्याकडून घडेल तेवढी मी सेवा करते. आज मिळालेल्या पुरस्काराने इतक्या वर्षांपासून काम केले, त्या कामाचे चीज झाले.’’