शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

देशात वाढता असंतोष, बेकारी

By admin | Updated: April 30, 2016 01:15 IST

माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे. हा समाज सर्वांनी लायक ठेवला पाहिजे.

पिंपरी : माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे. हा समाज सर्वांनी लायक ठेवला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आपण सर्व जण ही प्रतिज्ञा घेऊ. देशात असंतोष वाढत आहे. बेकारी वाढत चालली आहे. शिक्षण व आरोग्य महाग झाले आहे. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषद व लायन्स क्लब भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात श्रम-उद्योग परिषद आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आले. त्या वेळी वैद्य बोलत होते. निवृत्त कामगार आयुक्त टी. जी. चोळके, ऱ्मनोहर पारळकर, ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, बथुवेल बलिद, परशुराम बोऱ्हाडे, पी. के. सावंत आदी उपस्थित होते. वैद्य म्हणाले, आंबेडकरांच्या विचारांचे चिंतन व मनन केले पाहिजे. वाढती बेकारी समाज गिळंकृत करेल. कारखाना मनुष्यविरहीत होऊ शकतो. माणसाचे जीवन महत्त्वाचे आहे. त्याचा विचार केला पाहिजे. कामगारांचे जीवन अवघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या जात आहेत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. देशाच्या आर्थिक प्रगतीबरोबरच मानव विकास निर्देशांकही वाढला पाहिजे.उपेक्षित कष्टकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. स्मशानभूमी सेवक सोना प्रधान, चर्मकार मधुकर वाघ, शवविच्छेदन मजूर सचिन घोलप, मोलकरीण संगीता साठे, रखवालदार धनसुख पटेल, बांधकाम मजूर रामकंवर जाधव, सफाई मजूर रंजना बालघरे, भाजीविक्रेते ठकाजी नरड यांना सन्मानित करण्यात आले. गिरीश प्रभुणे यांना दिनबंधू पुरस्कार, उद्योजक रामदास माने यांना राष्ट्रीय निर्मलग्राम मित्र पुरस्कार, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय घोडके यांना कर्मचारी हितसंवर्धन संघटना पुरस्कार देण्यात आला. राजेंद्र वाघ व दत्तात्रय तरटे यांना महाराष्ट्र श्रमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राजेंद्र वाघ यांनी कामगारांवर आधारित निर्भीड ही कविता सादर केली. प्रभुणे, पारळकर यांनी विचार व्यक्त केले. चोळके यांनी अध्यक्षीय भाषण केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. आभार परशुराम बोऱ्हाडे यांनी मानले. (प्रतिनिधी)>श्रमाची चीज : भीती माहीत नाहीकार्यक्रमात कष्टकऱ्यांची प्रगट मुलाखत घेताना पुरुषोत्तम सदाफुले यांनी स्मशानभूमी सेवक सोनाबाई प्रधान यांना स्मशानात काम करताना तुम्हाला भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारला. त्या वेळी प्रधान म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत काम करीत आहे. भीती कुठे आहे, मला माहीत नाही. माझ्याकडून घडेल तेवढी मी सेवा करते. आज मिळालेल्या पुरस्काराने इतक्या वर्षांपासून काम केले, त्या कामाचे चीज झाले.’’