शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

भूजलाची माहिती संकेतस्थळावर

By admin | Updated: October 25, 2016 02:03 IST

राज्यातील भूजल पातळीची अधिक अचूक माहिती मिळावी, यासाठी जवळपास प्रत्येक गावातील तब्बल ३५ हजार निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीची नोंद घेतली जाणार आहे.

- विशाल शिर्के, पुणेराज्यातील भूजल पातळीची अधिक अचूक माहिती मिळावी, यासाठी जवळपास प्रत्येक गावातील तब्बल ३५ हजार निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीची नोंद घेतली जाणार आहे. जून-२०१७ पासून ही माहिती भूजल विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून, त्यामुळे गावनिहाय टंचाई आराखडा करण्यासाठी मदत होणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातील भूजलाची माहिती संकलित केली जाते. दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व आॅक्टोबरमध्ये राज्यातील ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींतून पाणीपातळीचा आढावा घेतला जातो. त्या आधारे राज्याचा टंचाई आराखडा तयार केला जातो. त्यानुसार, आॅक्टोबर, जानेवारी व एप्रिलनंतर कोणत्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, याचा आराखडा बांधला जातो. दुष्काळी परिस्थितीचा सामना व तसे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला ही माहिती उपयुक्त ठरते. गेल्या काही वर्षांत मान्सून बदलत आहे. अनेकदा जूनमध्ये पाऊसच पडत नाही. जुलैच्या मध्यापर्यंतदेखील पाऊस लांबल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या कालावधीत कोणतीही अधिकृत व अचूक आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नव्हती, तसेच एखाद्या तालुक्यातील विविध भागांत पावसाचे व पाणीउपसा करण्याचे प्रमाणदेखील अतिशय भिन्न असल्याचे अभ्यासावरून समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील ४४ हजार गावांतील ३५ हजार निरीक्षण विहिरीतून पाणीपातळीची आकडेवारी आता संकलित केली जाणार आहे. त्यातील २१ हजार विहिरी निश्चित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जवळपास गावपातळीवरील भूजलाची आकडेवारी हाती येणार आहे. या अगोदर सप्टेंबरनंतर चार वेळा भूजल पातळी तपासण्यात येत होती. आता सुरुवातीच्या टप्प्यात दर महिन्याला एकदा अशी वर्षातून बारा वेळा तपासणी करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात आठवड्याला एकदा असे वर्षांतून ५२ वेळा अथवा गरजेनुसार त्या पेक्षा अधिक वेळा भूजल तपासणी करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. ही सर्व माहिती ‘भूजल वेध’ या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.राज्याच्या भूजलाची अधिक अचूक माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढील टप्प्यात वर्षातून ५२ वेळा अथवा दर दिवसालादेखील पाण्याची आकडेवारी मिळेल, असे नियोजन करण्यात येणार आहे. - सुनील पाटील, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा