शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

भूजलाची माहिती संकेतस्थळावर

By admin | Updated: October 25, 2016 02:03 IST

राज्यातील भूजल पातळीची अधिक अचूक माहिती मिळावी, यासाठी जवळपास प्रत्येक गावातील तब्बल ३५ हजार निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीची नोंद घेतली जाणार आहे.

- विशाल शिर्के, पुणेराज्यातील भूजल पातळीची अधिक अचूक माहिती मिळावी, यासाठी जवळपास प्रत्येक गावातील तब्बल ३५ हजार निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीची नोंद घेतली जाणार आहे. जून-२०१७ पासून ही माहिती भूजल विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून, त्यामुळे गावनिहाय टंचाई आराखडा करण्यासाठी मदत होणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातील भूजलाची माहिती संकलित केली जाते. दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च व आॅक्टोबरमध्ये राज्यातील ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींतून पाणीपातळीचा आढावा घेतला जातो. त्या आधारे राज्याचा टंचाई आराखडा तयार केला जातो. त्यानुसार, आॅक्टोबर, जानेवारी व एप्रिलनंतर कोणत्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, याचा आराखडा बांधला जातो. दुष्काळी परिस्थितीचा सामना व तसे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला ही माहिती उपयुक्त ठरते. गेल्या काही वर्षांत मान्सून बदलत आहे. अनेकदा जूनमध्ये पाऊसच पडत नाही. जुलैच्या मध्यापर्यंतदेखील पाऊस लांबल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या कालावधीत कोणतीही अधिकृत व अचूक आकडेवारी सरकारकडे उपलब्ध नव्हती, तसेच एखाद्या तालुक्यातील विविध भागांत पावसाचे व पाणीउपसा करण्याचे प्रमाणदेखील अतिशय भिन्न असल्याचे अभ्यासावरून समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील ४४ हजार गावांतील ३५ हजार निरीक्षण विहिरीतून पाणीपातळीची आकडेवारी आता संकलित केली जाणार आहे. त्यातील २१ हजार विहिरी निश्चित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जवळपास गावपातळीवरील भूजलाची आकडेवारी हाती येणार आहे. या अगोदर सप्टेंबरनंतर चार वेळा भूजल पातळी तपासण्यात येत होती. आता सुरुवातीच्या टप्प्यात दर महिन्याला एकदा अशी वर्षातून बारा वेळा तपासणी करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात आठवड्याला एकदा असे वर्षांतून ५२ वेळा अथवा गरजेनुसार त्या पेक्षा अधिक वेळा भूजल तपासणी करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. ही सर्व माहिती ‘भूजल वेध’ या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.राज्याच्या भूजलाची अधिक अचूक माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढील टप्प्यात वर्षातून ५२ वेळा अथवा दर दिवसालादेखील पाण्याची आकडेवारी मिळेल, असे नियोजन करण्यात येणार आहे. - सुनील पाटील, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा