शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

येऊरच्या इको टुरिझमला हिरवा कंदील

By admin | Updated: May 21, 2016 03:28 IST

ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेल्या येऊरला आता इको टुरिझम दर्जा मिळणार आहे.

ठाणे : ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेल्या येऊरला आता इको टुरिझम दर्जा मिळणार आहे. महापालिका आणि वन विभाग यांच्यात झालेल्या चर्चेअंती यावर एकमत झाले आहे. या पर्यटन उभारणीचा सर्व खर्च पालिका आपल्या खांद्यावर घेणार असून त्यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेने वन विभागाकडून मागवला आहे. शिवाय, येऊर पर्यटन केंद्र आणि आदिवासी कला प्रदर्शन केंद्राच्या आराखड्यास वन विभागाने तत्त्वता मान्यता दिल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्याचबरोबर येऊरमधील तलावाचे महापालिका सुशोभीकरण करणार असून तिथे पर्यटकांना जाता यावे म्हणून वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. येऊरमधील पर्यावरणस्नेही पर्यटन केंद्र उभारणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवून आयुक्त जयस्वाल यांनी त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव वनविभागाला सादर करण्यास सांगितले आहे. सुप्रसिद्ध कलावंत आणि जगभरातील अक्षरधाम मंदिराचे मुख्य आरेखक अरुणकुमार यांनी येऊरमध्ये पयर्टन सेंटर आणि आदिवासी कला प्रदर्शन केंद्र उभारण्यासंबंधीचा आराखडा तयार केला आहे. येऊरमधील सुमारे दीड एकर जागेमध्ये पयर्टन केंद्र आणि आदिवासी कला प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. कोणतीही वृक्षतोड न करता तसेच पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी या प्रकल्पात घेतली जाणार आहे. या पालिका येऊरमध्ये तलावाचे सुशोभीकरण करणार असून पर्यटकांना तेथे जाता यावे म्हणून वाहतूक सेवा सुरू करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. मात्र, वनविभागाच्या परवानगीशिवाय ही सेवा सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे वनविभागाने त्यासंबंधीचा प्रस्ताव पालिकेला सादर केल्यास पर्यटनाचा हा मार्गदेखील खुला होणार आहे. (प्रतिनिधी)रस्त्यांचे प्रस्तावही वन विभागाकडेघोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत सेवा रस्ते तयार करण्याचे काम महापालिकेने काही महिन्यांपूर्वी हाती घेतले आहे. मात्र, वन विभागाच्या जागेमुळे चार ठिकाणी कामात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या वाइल्ड लाइफ बोर्डाकडे हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच पातलीपाडा येथील उद्यान आणि टिकूजिनीवाडी भागातील रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्तीचाही प्रस्ताव वन विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. टिकुजिनीवाडीच्या रस्ता दुरुस्तीला वन विभागाने मान्यता दिल्याने त्याचे काम मार्गी लागले आहे. टिकुजिनीवाडी येथील मलनि:सारण वाहिन्यांच्या कामासाठी परिसरातील बेकायदा बांधकामे हटवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. श्रीनगर ते गायमुख हा रस्ता वन विभागाच्या जागेतून जाणार असून त्याचे सर्वेक्षण सुरू असल्यामुळे नेमकी किती जागा लागेल, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. सर्वेक्षण पूर्ण होताच त्याचा प्रस्ताव सादर होईल.