शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

एलईडीमुळे मोठी ऊर्जाबचत

By admin | Updated: May 1, 2016 01:59 IST

परवडणाऱ्या दरात एलईडी दिव्यांचे वितरण करण्यासाठी राबवण्यात आलेल्या उजाला उपक्रमांतर्गत राज्यात सुमारे १.६२ कोटी एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात आले असून, त्यामुळे दरवर्षी

मुंबई : परवडणाऱ्या दरात एलईडी दिव्यांचे वितरण करण्यासाठी राबवण्यात आलेल्या उजाला उपक्रमांतर्गत राज्यात सुमारे १.६२ कोटी एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात आले असून, त्यामुळे दरवर्षी १०८ कोटी युनिटची बचत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वर्षाला सुमारे १६ लाख टनाने घट होण्यास मदत होणार असतानाच ग्राहकांच्या वीज बिलात ४३० कोटी रुपयांची बचत होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०१५ मध्ये ही योजना सुरू केली. ऊर्जा मंत्रालयांतर्गत ही योजना राबवण्यात येत असून, राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणवर आहे. योजनेंतर्गत देशभरात सुमारे १० कोटीपेक्षा जास्त एलईडी दिव्यांचे वितरण करण्यात आले आहे. एलईडी दिव्यांच्या वितरणामुळे राज्यात दरवर्षी १०८ कोटी युनिटची बचत होणार असून, या बचतीमुळे २८५ मेगावॅटच्या स्थापित वीजनिर्मिती क्षमतेचीही बचत होणार आहे. राज्यात ही योजना जुलै २०१५ साली राबवण्यात आली. सुमारे एका वर्षाच्या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात या योजनेंतर्गत एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत राज्यातील प्रत्येक गावातही एलईडी दिव्याचे वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)देशभरात दहा कोटी एलईडी दिव्यांचे वितरण करणे ही एक विक्रमी कामगिरी असून, ते ग्राहकांच्या हिताचे आहे. आपले कार्बन उत्सर्जन ३० ते ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. कार्बन उत्सर्जन आणखी कमी करण्यासाठी या वर्षी भारत सरकार आणखी २० कोटी एलईडी दिव्यांची खरेदी करणार आहे.- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री