शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना हवीय मुंबईत जागा !

By admin | Updated: November 14, 2015 03:39 IST

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सरकारी कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र राहण्याची व्यवस्था नसल्याने हॉटेल किंवा इतरत्र राहण्याशिवाय पर्याय नसतो

जगदीश कोष्टी,  साताराग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सरकारी कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र राहण्याची व्यवस्था नसल्याने हॉटेल किंवा इतरत्र राहण्याशिवाय पर्याय नसतो. मुंबईत प्रत्येक ग्रामपंचायतीला हक्काची जागा मिळावी, यासाठी वाई तालुक्यातील ‘यशवंत आवास विकास मंडळी’ संस्थेच्या पुढाकारातून राज्यातील ७,३०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून मुंबईला पाठविले आहेत.शेतकऱ्यांपासून विविध घटकांना कामानिमित्त मुंबईला जावे लागते. मात्र मुक्काम करण्याची वेळ आलीच तर काय करायचे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्याची सोडवणूक करण्यासाठी यशवंत संस्थेची स्थापना झाली. राज्यातील ३५८ तालुक्यांतील २७ हजार ९०३ ग्रामपंचायती व ४४ हजार ७०० महसुली गावांशी संस्थेने पत्रांद्वारे संपर्क साधला. त्यासाठी संस्थेचे विजय यादव यांनी ४ लाख रुपये खर्च केले. विशेष म्हणजे पत्र मिळाल्यानंतर मुंबईत सुमारे दीड हजार फुटांचे मोफत घर मिळावे म्हणून ७,३०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव केले, तसेच हक्काच्या घरासाठी वाई तालुक्यातील वेळे येथील ‘यशवंत आवास विकास मंडळी’ संस्थेला अधिकारही दिले आहेत.